शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अध्यक्षांसाठी आमदारांचा सूर फिका

By admin | Updated: January 18, 2017 03:35 IST

रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार

आविष्कार देसाई,

अलिबाग- रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष सुरेश टोकरे यांना मतदार संघच शिल्लक न राहिल्याने त्यांचे पुनर्वसन कोणत्या मतदार संघात होणार हे स्पष्ट झालेले नाही. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत प्रयत्न करणारा मी कोण, ज्यांनी त्यांना अध्यक्षपद दिले तेच उमेदवारीबाबत ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. लाड यांच्या बोलण्यातला सूर हा टोकरे यांच्या पथ्यावर पडेल असा मुळीच जाणवला नाही.रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघत आहे. विशेषत: सध्या कर्जत तालुक्यावर सर्वांच्याच नजरा वळल्या आहेत. कर्जतचे विद्यमान रायगड जिल्हा परिषद सदस्यांना मतदार संघ राहिलेला नाही. त्यामुळे टोकरे नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हणून ओळखले जाते. जिल्हा परिषदेचा सदस्य आणि त्यात जर त्याने अध्यक्षपद भूषविले असेल, तर त्याचे प्रमोशन आमदारकीसाठी होते, असा राजकीय इतिहास सांगतो. कर्जत तालुक्यामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे आमदार आहेत. राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या टोकरे यांनी अध्यक्षपदाच्या कालावधीत कर्जत तालुक्यात विकासकामांच्या जोरावर चांगली बांधणी केली आहे. नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही त्यांनी कोट्यवधीची कामे केली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत, तसेच आमदार सुरेश लाड यांनीही आमदार निधीच्या माध्यमातून विकास केला आहे. रिलायन्सच्या बेकायदा पाइप लाइन विरोधातही त्यांनी आंदोलन छेडले आहे. दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक तालुकाभर पसरवित आहेत. दोन्ही नेत्यांना अफाट राजकीय महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे एकाच म्यानात दोन तलवारी कशा बसणार हाही मोठा प्रश्नच आहे.कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा मतदार संघ आहेत. टोकरे यांना मतदार संघ शिल्लक राहिलेला नाही. टोकरे खांडस मतदार संघातून इच्छुक असल्याचे बोलले जाते, परंतु हा मतदार संघ शेकापच्या ताब्यात आहे. शेकाप त्यावरील हक्क सोडणार नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. टोकरे यांना कोणत्या मतदार संघातून उमेदवारी देणार असे त्यांना विचारले असता, ओसवाल म्हणाले, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आणि स्थानिक आमदार सुरेश लाड हे ठरवतील. टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही लाड बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.>‘कर्तृत्ववान व्यक्तीला कोणीच रोखू शकत नाही’टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत स्थानिक आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून प्रयत्न करणार का, असे आमदार सुरेश लाड यांना विचारले, असता ज्यांनी त्यांना अध्यक्षपदी बसविले तेच ठरवतील, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्यावेळी त्यांचा सूर हा टोकरे यांच्यासाठी चांगला आहे, असे काही वाटले नाही. ज्यांचे कर्तृत्व आहे त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असेही सुरेश लाड यावेळी बोलायला विसरले नाहीत. एकूणच टोकरे यांना उमेदवारी मिळण्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे घेणार आहेत. त्यामुळे टोकरे यांच्यासह सर्वांना त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, एवढे मात्र निश्चित आहे.