शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन पिकात गंधकाचा वापर वाढवणार!

By admin | Updated: September 20, 2015 22:44 IST

दुय्यम अन्नद्रव्याचे समतोल प्रमाण वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा भर.

अकोला : विदर्भाच्या जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे सातत्याने चिंताजनक निष्कर्ष समोर येत असून, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाने भर दिला आहे. याकरिता शेतकर्‍यांच्या शेतावर शेती दिन घेण्यात येत असून, सोयाबीनमधील कमी झालेले गंधक, दुय्यम अन्नद्रव्याचे प्रमाण भरू न काढण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विदर्भातील जमिनीमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४0, गंधक २0.४५ व जस्त ५0.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्यांचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण या आधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. दोन वर्षात कोणताच बदल झाला नसून, खताच्या वापरात आणखी वाढ झाली आहे. त्यासाठी जमिनीचे आरोग्य सुधारणे गरजेचे असून, अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्‍वत उत्पादकतेसाठी करावा लागणार आहे. जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतासोबतच संतुलित खत व्यवस्थापन करावे लागणार आहे. सोयाबीन पिकातील गंधक व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिके, प्राणी व मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या विषयावर शेती दिनाचे कार्यक्रम शेतकर्‍यांच्या शेतावर घेण्यात येत असून, शुक्रवारी वाशिम जिल्हय़ातील चिखली या गावी शेती दिन घेण्यात आला. कृषी विज्ञान केंद्र करडा व डॉ. पंदेकृविच्यावतीने शेतकर्‍यांना गंधक व दुय्यम अन्नद्रव्याचे सोयाबीन पिकावरील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या संदर्भातील माहिती पत्रके शेतकर्‍यांना वितरित करण्यात आली. शेतकर्‍यांनी संतुलित खतांचा वापर करावा, हा या मागील उद्देश आहे. संतुलित गंधकाच्या वापरामुळे पिकांची योग्य वाढ, शेंगा व दाणे भरल्याचे शेतकर्‍यांना दाखविण्यात आले. याच पद्धतीने शेती दिन कार्यक्रमाला यावर्षी सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकाच्या शेत जमिनीमध्ये गंधक व दुय्यम अन्नद्रव्याचा वापर अर्थात संतुलित खताचे प्रमाण कसे असावे, यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. यासाठी शेती दिन कार्यक्रमाचे आयोजन करू न शेतकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत असल्याचे मृद व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रमुख प्रा. डी.बी.तामगाडगे यांनी सांगीतले.