शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

By admin | Updated: August 20, 2016 16:32 IST

पाऊस सतत सुरू असल्याने अकोल्यात सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे.

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे पण पाऊस सतत सुरू  असल्याने सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे. शेतक-यांनी किटकनाशके फवारणी करतांना त्यामध्ये पीक वाढीसाठीची संजिवके वापरली व खताचा अतिरिक्त वापर केल्याने सोयाबीन पीक जोमदार वाढले आहे.परिणामी अनेक ठिकाणी  फुले व शेंगावर प्रतिकुुल परिणाम झाल्याने फुले,शेंगाची संख्या घटली आहे.
 
 यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतक-यांनी वेळेवर पेरणी केली सुरू वातीला पिकांना पोषक ठरणारा पाऊस सतत सुरू  असल्याने पिके पिवळी पडली.सोयाबीनवरही त्याचे परिणाम झाले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक १३ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सलग चार ते पाच वर्षापासून सोयाबीन चे उत्पादन कमी होत आहे यावर्षी पाऊस पूरक असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची दाट पेरणी केली.त्यासाठी खतांचा व किटकनाशकांसोबत पिकवाढीसाठीची संजिवके वापरली अनेक शेतकºयांनी संजिवके, विद्राव्य द्रावणाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला.त्याचा परिणाम सोयाबीन पिक वाढीवर झाला आहे. अनेक भागात सोयाबीनची गुडघ्याएवढी वाढ झाली आहे. खते आणि संजिवक ामुळे तयार होणारे अन्नद्रव्य झाडांची वाढ करीत आहे. शिवाय दाट पेरणी केल्याने सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत म्हणजेच झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने केवळ झाडांची शेंडे प्रकाशसंश्लेषण करतात येथेच अन्नद्रव्य तयार केले जाते आणि मुळाशी असलेल्या पानांना अन्नद्रव्य पोहोेचत नसल्याने झाडांच्या शेंड्यांनी तयार केलेले अन्नद्रव्य मुळाची पाने शोषूण घेतात परिणामी झाडाच्या खालच्या बाजूला फुले,शेंगा येण्याचे प्रमाण घटते. सद्या हीच परिस्थिती आहे. 
सोयाबीनच्या एका झाडाला किमान ६० ते ७० शेंगा धरतात परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्या ठिकाणी हे प्रमाणा २० ते २५ शेंगावर येण्याची शक्यता आहे.
 
- कृषी विद्यापीठाची शिफारस 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाढरोधक संजिवकांची शिफारस केली आहे. पेरणीपासून ४० दिवसाच्या आत ही संजिवके सोयाबीनवर फवारायची आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकºयांना संजिवकांची फवारणी करता आली नाही.
- अतिरिक्त खते, टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीनची वाढ होण्यास कारणीभूत ठरते शिवाय दाट पेरणी केल्याने पिकांच्या मुळाशी प्रकाश पोहोचत नाही परिणामी शेंड्यांनी मिळवलेला प्रकाश व अन्नद्रव्यावर मुळाशी असलेली पाने जगतात आणि दाट पेरणीमुळे स्पर्धा वाढल्याने पिके वाढतात.त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेगांचे प्रमाण घटते.
- डॉ. योगेश इंगळे, सोयाबीन तज्ज्ञ संशोधक, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र,(डॉ.पदेंकृवि) अमरावती.