शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

By admin | Updated: August 20, 2016 16:32 IST

पाऊस सतत सुरू असल्याने अकोल्यात सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे.

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे पण पाऊस सतत सुरू  असल्याने सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे. शेतक-यांनी किटकनाशके फवारणी करतांना त्यामध्ये पीक वाढीसाठीची संजिवके वापरली व खताचा अतिरिक्त वापर केल्याने सोयाबीन पीक जोमदार वाढले आहे.परिणामी अनेक ठिकाणी  फुले व शेंगावर प्रतिकुुल परिणाम झाल्याने फुले,शेंगाची संख्या घटली आहे.
 
 यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतक-यांनी वेळेवर पेरणी केली सुरू वातीला पिकांना पोषक ठरणारा पाऊस सतत सुरू  असल्याने पिके पिवळी पडली.सोयाबीनवरही त्याचे परिणाम झाले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक १३ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सलग चार ते पाच वर्षापासून सोयाबीन चे उत्पादन कमी होत आहे यावर्षी पाऊस पूरक असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची दाट पेरणी केली.त्यासाठी खतांचा व किटकनाशकांसोबत पिकवाढीसाठीची संजिवके वापरली अनेक शेतकºयांनी संजिवके, विद्राव्य द्रावणाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला.त्याचा परिणाम सोयाबीन पिक वाढीवर झाला आहे. अनेक भागात सोयाबीनची गुडघ्याएवढी वाढ झाली आहे. खते आणि संजिवक ामुळे तयार होणारे अन्नद्रव्य झाडांची वाढ करीत आहे. शिवाय दाट पेरणी केल्याने सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत म्हणजेच झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने केवळ झाडांची शेंडे प्रकाशसंश्लेषण करतात येथेच अन्नद्रव्य तयार केले जाते आणि मुळाशी असलेल्या पानांना अन्नद्रव्य पोहोेचत नसल्याने झाडांच्या शेंड्यांनी तयार केलेले अन्नद्रव्य मुळाची पाने शोषूण घेतात परिणामी झाडाच्या खालच्या बाजूला फुले,शेंगा येण्याचे प्रमाण घटते. सद्या हीच परिस्थिती आहे. 
सोयाबीनच्या एका झाडाला किमान ६० ते ७० शेंगा धरतात परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्या ठिकाणी हे प्रमाणा २० ते २५ शेंगावर येण्याची शक्यता आहे.
 
- कृषी विद्यापीठाची शिफारस 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाढरोधक संजिवकांची शिफारस केली आहे. पेरणीपासून ४० दिवसाच्या आत ही संजिवके सोयाबीनवर फवारायची आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकºयांना संजिवकांची फवारणी करता आली नाही.
- अतिरिक्त खते, टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीनची वाढ होण्यास कारणीभूत ठरते शिवाय दाट पेरणी केल्याने पिकांच्या मुळाशी प्रकाश पोहोचत नाही परिणामी शेंड्यांनी मिळवलेला प्रकाश व अन्नद्रव्यावर मुळाशी असलेली पाने जगतात आणि दाट पेरणीमुळे स्पर्धा वाढल्याने पिके वाढतात.त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेगांचे प्रमाण घटते.
- डॉ. योगेश इंगळे, सोयाबीन तज्ज्ञ संशोधक, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र,(डॉ.पदेंकृवि) अमरावती.