शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

सोयाबीन पिकाची झाली अवास्तव वाढ !

By admin | Updated: August 20, 2016 16:32 IST

पाऊस सतत सुरू असल्याने अकोल्यात सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे.

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने पिकांना पोषक ठरला आहे पण पाऊस सतत सुरू  असल्याने सोयाबीन पिकांची अतिरिक्त वाढ झाली आहे. शेतक-यांनी किटकनाशके फवारणी करतांना त्यामध्ये पीक वाढीसाठीची संजिवके वापरली व खताचा अतिरिक्त वापर केल्याने सोयाबीन पीक जोमदार वाढले आहे.परिणामी अनेक ठिकाणी  फुले व शेंगावर प्रतिकुुल परिणाम झाल्याने फुले,शेंगाची संख्या घटली आहे.
 
 यावर्षी वेळेवर पाऊस झाल्याने शेतक-यांनी वेळेवर पेरणी केली सुरू वातीला पिकांना पोषक ठरणारा पाऊस सतत सुरू  असल्याने पिके पिवळी पडली.सोयाबीनवरही त्याचे परिणाम झाले. विदर्भात यावर्षी सर्वाधिक १३ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन पेरणी झाली आहे. सलग चार ते पाच वर्षापासून सोयाबीन चे उत्पादन कमी होत आहे यावर्षी पाऊस पूरक असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची दाट पेरणी केली.त्यासाठी खतांचा व किटकनाशकांसोबत पिकवाढीसाठीची संजिवके वापरली अनेक शेतकºयांनी संजिवके, विद्राव्य द्रावणाचा मोठ्याप्रमाणावर वापर केला.त्याचा परिणाम सोयाबीन पिक वाढीवर झाला आहे. अनेक भागात सोयाबीनची गुडघ्याएवढी वाढ झाली आहे. खते आणि संजिवक ामुळे तयार होणारे अन्नद्रव्य झाडांची वाढ करीत आहे. शिवाय दाट पेरणी केल्याने सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत म्हणजेच झाडांच्या मुळापर्यंत पोहोचत नसल्याने केवळ झाडांची शेंडे प्रकाशसंश्लेषण करतात येथेच अन्नद्रव्य तयार केले जाते आणि मुळाशी असलेल्या पानांना अन्नद्रव्य पोहोेचत नसल्याने झाडांच्या शेंड्यांनी तयार केलेले अन्नद्रव्य मुळाची पाने शोषूण घेतात परिणामी झाडाच्या खालच्या बाजूला फुले,शेंगा येण्याचे प्रमाण घटते. सद्या हीच परिस्थिती आहे. 
सोयाबीनच्या एका झाडाला किमान ६० ते ७० शेंगा धरतात परंतु ज्या ठिकाणी सोयाबीनची अतिरिक्त वाढ झाली आहे. त्या ठिकाणी हे प्रमाणा २० ते २५ शेंगावर येण्याची शक्यता आहे.
 
- कृषी विद्यापीठाची शिफारस 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने वाढरोधक संजिवकांची शिफारस केली आहे. पेरणीपासून ४० दिवसाच्या आत ही संजिवके सोयाबीनवर फवारायची आहेत. परंतु सततच्या पावसामुळे शेतकºयांना संजिवकांची फवारणी करता आली नाही.
- अतिरिक्त खते, टॉनिक वापरल्यामुळे सोयाबीनची वाढ होण्यास कारणीभूत ठरते शिवाय दाट पेरणी केल्याने पिकांच्या मुळाशी प्रकाश पोहोचत नाही परिणामी शेंड्यांनी मिळवलेला प्रकाश व अन्नद्रव्यावर मुळाशी असलेली पाने जगतात आणि दाट पेरणीमुळे स्पर्धा वाढल्याने पिके वाढतात.त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. शेगांचे प्रमाण घटते.
- डॉ. योगेश इंगळे, सोयाबीन तज्ज्ञ संशोधक, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र,(डॉ.पदेंकृवि) अमरावती.