शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

पावसाअभावी केवळ सव्वा टक्के क्षेत्रावर पेरण्या !

By admin | Updated: June 18, 2015 02:34 IST

मान्सूनचे आगमन होऊन आठवडा उलटला तरी राज्यात १६ जूनअखेर सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने केवळ सव्वा टक्के क्षेत्रावरच

पुणे : मान्सूनचे आगमन होऊन आठवडा उलटला तरी राज्यात १६ जूनअखेर सरासरीच्या खूपच कमी पाऊस झाल्याने केवळ सव्वा टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांच्या पेरण्या झाल्याची माहिती कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी येथे दिली.कृषी विभागाने वेगवेगळ््या टप्प्यांत अपेक्षित पावसाअभावी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आपत्कालीन आराखडा तयार केला आहे. जमिनीत पुरेसा ओलावा आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात खरिपाचे सुमारे १३५ लाख हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत केवळ सव्वा टक्के म्हणजे १ लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्रांवरच पेरण्या झाल्या आहेत. कृषी विभागाने खरीप हंगामाची पूर्ण तयारी केली आहे. चालू हंगामासाठी १६.६४ लाख क्विंटल बियाण्सांची आवश्यकता असताना १७.५० लाख क्विंटल बियाण्याचा पुरावठा केलेला आहे. तसेच खताचा २१ टक्के अधिक साठा उपलब्ध आहे. राज्यात खरीप पिकांमध्ये कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र मोठे असून, त्यासाठीही बियाण्यांचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे, असे देशमुख म्हणाले.अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे कृषी विभागाने पाऊस १५ दिवस लांबणीवर पडल्यास किंवा ३० तसेच ४५ दिवस उशिरा आल्यास कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा आराखडा तयार केल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)