शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

४० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 17, 2014 00:43 IST

मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत.

पश्चिम विदर्भ : पावसाची प्रतीक्षा, कपाशीचा पेरा २० टक्क्यांनी वाढणारयवतमाळ : मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. शेतीची मशागत झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे-खताची खरेदीही केली. परंतु पावसाचाच पत्ता नाही. अमरावती विभागात खरिपाचे पेरणी योग्य क्षेत्र ४० लाख हेक्टर एवढे आहे. यातील १६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होतो. तर १२ लाख हेक्टरमध्ये कपाशी पेरली जाते. परंतु यावर्षी सोयाबीनचे बियाणे प्रचंड महागले आहे.त्या तुलनेत बाजारामध्ये सोयाबीनच्या पिकाला तेवढा भाव मिळत नाही. त्यातच महाग असूनही सोयाबीनचे बियाणे सहज उपलब्ध होत नाही. एकट्या अमरावती विभागात एक लाख क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने बोगस कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.सोयाबीनची ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल पुन्हा कपाशीकडे वाढला आहे. कपाशीच्या बियाण्याचे भाव नियंत्रणात आहे, बियाणेही सहज उपलब्ध होत आहे. शिवाय कापसाला बाजारात चांगला भाव मिळतो आहे. किमान हमी भावाची तर खात्री आहे. त्यामुळेच यावर्षी खरीप हंगामात पश्चिम विदर्भात कपाशीचा पेरा २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र १२ लाख हेक्टरवरून १६ लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे. अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्यात धुळ पेरणी केली जाते. पाऊस आणखी लांबला तरी धुळ पेरणीवर फार फरक पडत नसल्याचे कृषी खात्यातून सांगण्यात आले. सिंचन व्यवस्थेवर (ड्रीप प्लॅन्टेशन) पश्चिम विदर्भात चार हजार २०० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. परंतु रखरखत्या उन्हाळ्यात या घातलेल्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा तेवढा कायम राहत नाही. पर्यायाने वेळीच पाऊस न आल्यास कपाशीचे हे पीक अडचणीत सापडण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)