शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

४० लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

By admin | Updated: June 17, 2014 00:43 IST

मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत.

पश्चिम विदर्भ : पावसाची प्रतीक्षा, कपाशीचा पेरा २० टक्क्यांनी वाढणारयवतमाळ : मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने पश्चिम विदर्भातील ४० लाख हेक्टरवरील पेरण्याही लांबल्या आहेत. पश्चिम विदर्भातील यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यात शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. शेतीची मशागत झाली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे-खताची खरेदीही केली. परंतु पावसाचाच पत्ता नाही. अमरावती विभागात खरिपाचे पेरणी योग्य क्षेत्र ४० लाख हेक्टर एवढे आहे. यातील १६ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनचा पेरा होतो. तर १२ लाख हेक्टरमध्ये कपाशी पेरली जाते. परंतु यावर्षी सोयाबीनचे बियाणे प्रचंड महागले आहे.त्या तुलनेत बाजारामध्ये सोयाबीनच्या पिकाला तेवढा भाव मिळत नाही. त्यातच महाग असूनही सोयाबीनचे बियाणे सहज उपलब्ध होत नाही. एकट्या अमरावती विभागात एक लाख क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची कमतरता असल्याने बोगस कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून कृषी विभागाच्या नाकावर टिच्चून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे.सोयाबीनची ही स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांचा कल पुन्हा कपाशीकडे वाढला आहे. कपाशीच्या बियाण्याचे भाव नियंत्रणात आहे, बियाणेही सहज उपलब्ध होत आहे. शिवाय कापसाला बाजारात चांगला भाव मिळतो आहे. किमान हमी भावाची तर खात्री आहे. त्यामुळेच यावर्षी खरीप हंगामात पश्चिम विदर्भात कपाशीचा पेरा २० ते २५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र १२ लाख हेक्टरवरून १६ लाखांवर जाण्याची दाट शक्यता आहे. अमरावती विभागात केवळ बुलडाणा जिल्ह्यात धुळ पेरणी केली जाते. पाऊस आणखी लांबला तरी धुळ पेरणीवर फार फरक पडत नसल्याचे कृषी खात्यातून सांगण्यात आले. सिंचन व्यवस्थेवर (ड्रीप प्लॅन्टेशन) पश्चिम विदर्भात चार हजार २०० हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली आहे. परंतु रखरखत्या उन्हाळ्यात या घातलेल्या पाण्यामुळे जमिनीतील ओलावा तेवढा कायम राहत नाही. पर्यायाने वेळीच पाऊस न आल्यास कपाशीचे हे पीक अडचणीत सापडण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी योग्य चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)