शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर, काही दिवसांपासून आयसीयूमध्ये सुरु आहेत उपचार; चाहते चिंतेत
2
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
3
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
4
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
5
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
6
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
7
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
8
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
9
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
10
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
11
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
12
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
13
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
14
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
15
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
16
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
17
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
18
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
20
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला

पेरण्या संकटात

By admin | Updated: July 10, 2017 04:37 IST

मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने डोळे वटारल्याने जवळपास सर्वच जिल्ह्यातील पेरण्या संकटात आल्या आहेत. मराठवाड्यात साधारण ४३ लाख हेक्टर खरीप पीक पेरणी क्षेत्र आहे. त्यातील सुमारे २५ टक्क्यांदरम्यान पेरणी झालेली आहे. विभागाची पावसाची सरासरी ७७९ मि.मी. इतकी असून आतापर्यंत १९० मि.मी.च्या आसपास म्हणजे केवळ २३ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुरुवातीला दमदार सुरुवात करून नंतर वरुणराजाने हात आखडता घेतला. मृगातही बऱ्यापैकी सरी कोसळल्याने फुलंब्री, खुलताबाद, सिल्लोड तालुक्यात पिके बहरली. परंतु आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे. वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव, कन्नड, सिल्लोड, पैठण तालुक्यात पीक परिस्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ७७ टक्के पेरणी झाली; मात्र पिके ऐन वाढीच्या काळात असतानाच १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिके माना टाकू लागली आहेत. शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाणी देऊन पिके जगविण्यासाठी धडपडत आहेत. पाच-सहा दिवसांत पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे. लातूर जिल्ह्यात ८५ टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे ६ लाख हेक्टर क्षेत्र असून, ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरा झाला आहे़ त्यामध्ये सोयाबीनचा सर्वाधिक ३ लाख हेक्टर पेरा आहे़ नांदेड जिल्ह्यात ९० टक्क्यांहून अधिक पेरण्या झाल्या. काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके अडचणीत आहेत. जिल्ह्यातील ७ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी ७ लाख २२ हजार हेक्टर क्षेत्र खरीपयोग्य शेतजमीन आहे. जिल्ह्यातील ३० मंडळात अत्यल्प पाऊस झाला.जालना जिल्ह्यात पावसाचा तब्बल २० दिवस खंड पडल्याने सुमारे तीन लाख हेक्टवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. खरीप ज्वारीची सरासरीच्या १.९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कापूस पिकाची उगवण चांगली झाली आहे. आता पावसाअभावी वाढ खुंटली आहे. परभणी जिल्ह्यात ३ लाख ३० हजार ६३७ हेक्टर (६३ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ही सर्व पिके धोक्यात आहेत. हिंगोली जिल्ह्यात ८१ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत, मात्र पाऊस नाही. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. >२० हेक्टर क्षेत्रावर फिरविला रोटाव्हेटरपावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे अमळनेर तालुक्यात शेतकऱ्यांनी २० हेक्टर क्षेत्रातील उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरविले. पाऊस नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सुनील कोळी, लोटन पाटील, तुषार पाटील, साहेबराव बडगुजर या शेतकऱ्यांनी सांगितले.दुबार पेरणीनंतरही पाऊस न आल्याने आत्महत्याजळगाव : दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने पीक वाया जाण्याच्या भीतीने नितीन विठ्ठल काटे (३०, रा. सुनसगाव, ता. भुसावळ ) यांनी विषप्राशन करून रविवारी आत्महत्या केली.