शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 2 टक्केच पेरण्या

By admin | Updated: June 24, 2014 00:55 IST

राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

मुंबई : राज्याच्या बहुतेक भागात पावसाने दडी मारलेली आहे. जूनचा चवथा आठवडाअखेर केवळ 2 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी आजच्या तारखेला राज्यातील 7क् ते 8क् टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या तीन वर्षात नैसर्गिक आपत्तीत 12 हजार कोटी रुपये राज्य शासनाने खर्च केले होते. आता पुन्हा राज्यात दुष्काळी चित्र निर्माण होते की काय, अशी परिस्थिती असल्याने प्रशासन धास्तावले आहे. 
दुसरीकडे राज्यात टँकरने पाणीपुरवठा होण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. 1 हजार 464 गावे, 3 हजार 687 वाडय़ांवर 1 हजार 454 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 
धरणांमधील पाणीसाठाही कमीकमी होत आहे. राज्यातील धरणांमध्ये आता सरासरी 2क् टक्के पाणी शिल्लक आहे. त्यात मोठय़ा, मध्यम आणि लघु प्रकल्पांचा समावेश आहे.  मोठय़ा धरणांचा विचार करता कोकणात 34 टक्के, मराठवाडय़ात 2क् टक्के, नागपूर विभागत 46 तर अमरावती विभागात 36 टक्के, नाशिक 14 टक्के, पुणो 13 टक्के  असा जलसाठा शिल्लक आहे. (प्रतिनिधी)
 
च्राज्य शासनाने ऑगस्ट 2क्12 ते 2क्13 या वर्षात दुष्काळ निवारणावर 5 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च केले. त्यानंतर गारपीटग्रस्तांना मदतीसाठी 35क्क् कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यानंतरच्या 3 हजार कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांना मदतीदाखल खर्च झाले. त्यात केंद्र सरकारने 3 हजार 5क्क् कोटी रुपयांची मदत राज्याला दिली, असे मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर म्हणाले.
 
च्मान्सूनच्या विलंबामुळे पाऊसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. राज्यात 2 टक्केच पेरणी झाली आहे. कोकण,पूर्व विदर्भात काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. तेथे मुख्य पीक असलेल्या भाताची रोपे तयार करण्याचे काम त्यामुळे सुरू झाले तरी लागवण झाली नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या काही भागात पाऊस पडला पण इतर भागात निराशाजनक चित्र असल्याचे राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी सांगितले.