शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

दक्षिण आशिया होरपळतोय!

By admin | Updated: July 5, 2015 02:40 IST

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी.

- शुभांगी भुते

(लेखिका मुंबई प्रादेशिक हवामान खात्याच्या संचालक आहेत.)

दक्षिण नैर्ऋत्य मान्सून भारतासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळ्याचा. पण त्याचं रूप वर्षानुवर्षे वेगवेगळं असतं. कधी मान्सून जास्त बरसतो तर कधी कमी. मान्सूनच्या बदलत्या रूपाला बरेच घटक कारणीभूत ठरतात. जसे की, अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम विचारात घेऊन भारतीय हवामान शास्त्र विभाग दरवर्षी पावसाची दीर्घकालीन पूर्वअनुमान देते. साधारणत: पावसाळ्याचे आगमन केरळपासून होते. टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण देश व्यापतो. या साऱ्या काळात वातावरणात कमी-जास्त प्रमाणात फरक पडत असतात. यंदा भारतात पावसाळ्याचे आगमन ५ जूनला झाले. २६ जूनपर्यंत त्याने संपूर्ण देश व्यापला. पण याच काळात आपल्या शेजारील देशात म्हणजेच पाकिस्तानात उष्णतेची लाट आली; आणि त्यात हजारो लोकांचे प्राण गेले. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक कमी दाबाचा पट्टा तयार होत असतो. या पट्ट्याची व्याप्ती राजस्थानपासून पाकिस्तानपर्यंत असते. यालाच उष्णता (हिट) असेही म्हणतात. याचवेळी संबंधित ठिकाणापासून बंगालच्या उपसागरापर्यंत द्रोणीय भाग तयार होऊन कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो. यालाच ‘हिट लो’ असेही म्हणतात. जेव्हा कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होतो तेव्हा वाऱ्यांची दिशा पश्चिम/दक्षिण अशी असते. हेच वारे समुद्राहून अधिक तीव्रतेने वाहतात. याचाच परिणाम म्हणून या वर्षी पाकिस्तानात उष्णतेची लाट येऊन गेली आहे. याच काळात जमिनीवर अगदी कमी प्रमाणात वारे वाहतात आणि हे सर्व वारे उष्ण-अतिउष्ण असतात. सोबतच या दिवसांत आर्द्रतेचे प्रमाण प्रचंड वाढते. सामान्य लोकांना ४३ डिग्री अंश सेल्सिअस असलेले तापमान पण ४७ डिग्रीपर्यंत आहे असे जाणवते. आता उद्भवलेली परिस्थिती खूप दिवस सुरू होती आणि हा एक संशोधनाचाच विषय आहे. तसेच आयपीसीसीच्या रिपोर्टमध्येसुद्धा हे नमूद केले आहे की, आताची उष्णतेची लाट ही जागतिक तापमानवाढीमुळे आली आहे. हे प्रमाण दक्षिण आशियायी देशांमध्ये अधिक आहे. हा एका एक्स्ट्रिम वेदरचा भाग असून, अनेक देश संशोधन करीत आहेत.अलनिनो, युरोपिय देशातील वातावरणातील उष्णता, समुद्राचे तापमान आणि पूर्व आशियायी देशांतील हवेचा दाब; असे अनेक घटक भारतीय मान्सूनवर प्रभाव पाडत असतात. समुद्राचे वाढते तापमान आणि हवेचा दाब या घटकांमुळे उष्णतेची लाट पसरते. जागतिक तापमानवाढही यात भर घालते. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून मान्सून हेलकावे खातो, उष्णतेच्या लाटेची व्याप्तीही वाढते. हे बदल मात्र आपल्याला सोसत नाहीत.