शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पोटासाठी दु:ख गाठीला

By admin | Updated: August 8, 2014 23:05 IST

आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडेगाव : आख्खं गाव मातीखाली जाऊन दु:खाचा डोंगर कोसळला असताना माळीणकरांनी हे दु:ख गाठीला बांधून पोटासाठी भातशेती करण्याचा निर्णय घेतला आहे. 
आता जर हे शेत केलं नाही तर 
वर्षभर विकतचा तांदूळ घ्यावा 
लागेल.   त्यामुळे शाश्वत संस्था व आदिवासी नागरिकांनी त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांचे 7क् कार्यकर्ते भात आवणी करीत आहेत.  
माळीण गावातील लोकांचे उत्पन्नाचे मुख्य साधन भातशेती व हिरडा गोळा करणो. यातून मिळणा:या उत्पन्नावर कसेबसे वर्ष काढायचे. या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने भातरोपे लवकर तयार झाली नाहीत. त्यात मुसळधार पावसामुळे माळीणमध्ये दुर्घटना घडली व पूर्ण गाव उद्ध्वस्त झाले. अनेक कुटुंबांतील एक ते दोन व्यक्ती मागे राहिल्या. बाकी सर्व लोक ढिगा:यात गाडले गेले. 
माळीणमधील लोकांनी भातशेती तयार करून ठेवली होती व पावसाची वाट पाहत होते. त्यात ही दुर्घटना घडली.
दुर्घटनेतून नशिबाने जगलेल्या लोकांना भात आवणी करून, मदत करण्याचा निर्णय शाश्वत संस्थेचे प्रमुख आनंद कपूर व कुसुमताई कर्णिक यांनी घेतला. 
29 कुटुंबांचे भातलागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. 6 ऑगस्टपासून 18 गावांमधील 42 कार्यकर्ते, तसेच 16 मच्छीमार कातकरी एकत्र आले.  देवराम असवले व हनुमंत बांबळे यांनी औताची मदत केली. 
विठ्ठल असवले, त्यांची पत्नी बबिता व मुलगी पूजा यांनी या सर्व कार्यकत्र्याची राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. या कामामध्ये कार्यकत्र्याची वाढ होत असून, सुमारे 7क् कार्यकर्ते भात लागवडीच्या कामाला लागले आहेत. 
(वार्ताहर)
 
4माळीण दुर्घटनाग्रस्त आदिवासी बांधवांना मदत करण्यासाठी खारीचा वाटा म्हणून हे काम हाती घेतले असून, पुढील काळात लागेल ती मदत आम्ही करू, अशी भावना बुधाजी डामसे, नामदेव भांगरे, मीराबाई दांगट, काळू कुडळ, बबन मावळे, स्मिता साळवे व आदिवासी शेतक:यांनी व्यक्त केली. 
 
4पहिल्या दिवशी दुंदा लेंभे, सखाराम झांजरे, लुमा लेंभे 
यांची भात आवणी या कार्यकत्र्यानी केली.
4त्यानंतर दि. 7 ऑगस्ट रोजी समीर लेंभे, धमर्ेेंद्र झांजरे, मंगलदास दांगट यांची भात आवणी केली.
4दोन दिवसांत सुमारे 2 एकर 
व 5 गुंठे क्षेत्रत भात आवणी 
केली गेली.