शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात जाऊ म्हणणाऱ्या गावांची व्यथा

By admin | Updated: June 24, 2015 23:08 IST

महाराष्ट्राचा असमतोल विकास आणि प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मुंबई, पुणे किंवा नाशिक या अपवादात्मक जिल्हे किंवा शहरे वगळता इतर जिल्ह्यांतील

वसंत भोसले -महाराष्ट्राचा असमतोल विकास आणि प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मुंबई, पुणे किंवा नाशिक या अपवादात्मक जिल्हे किंवा शहरे वगळता इतर जिल्ह्यांतील तरुण पिढी तेथे राहण्यास इच्छुक नाही. कारण कोल्हापूर किंवा तत्सम विकसित शहरातदेखील तरुण पिढीला भवितव्य नाही, असे वाटू लागले आहे. मग हा विकास केवळ मुंबई किंवा पुण्याचा होत असताना राज्यकर्त्यांनी गांभीर्याने पावले उचलणे आवश्यक आहे. कारण मुंबई-पुणे-नाशिकचा कॉरिडॉर सोडला तर उर्वरित महाराष्ट्राची प्रगती खुंटली आहे का, असा सवाल विचारण्याजोगी परिस्थिती आहे. त्यासाठी दोन पर्याय करता येऊ शकतात आणि एका मापदंडाची मोजपट्टी बाजूला ठेवली पाहिजे. दोन पर्याय कोणते तर विभाग किंवा प्रदेशानुसार नियोजनाची आखणी करणे आता थांबवायला हवी. दुसरे म्हणजे जिल्हा हा घटकही बाजूला ठेवायला हवा. कारण अनेक जिल्ह्यांतील अनेक तालुकेच्या तालुके मागास राहिले आहेत. मात्र त्याला नैसर्गिक कारणेही असतील किंवा आहेत, असे गृहीत धरले तरी शासनाने हस्तक्षेप करून विकासाचा मार्ग आखला पाहिजे.परवाची बातमी आहे. सांगली जिल्ह्याच्या अतिपूर्वेकडील आणि कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याच्या सीमेवरील जत तालुक्यातील ४२ गावांनी ‘आम्हाला कर्नाटकात जायचे आहे’, असा सूर लावला आहे. कारण गेल्या पन्नास वर्षांत या गावाची महसुली नोंद तेवढी महाराष्ट्रात आहे, असे म्हणायला हरकत नाही. निसर्गाचा कोप तर आहेच. या तालुक्यात वर्षभरात तुरळक पाऊस पडतो. इतका कमी पाऊस महाराष्ट्रातील ३५३ तालुक्यांपैकी एकाही तालुक्यात पडत नसेल. शेतीचे सिंचन केवळ चार टक्के आहे. खरीप किंवा रब्बी यापैकी एकाही पिकाची हमी देता येत नाही. आज महाराष्ट्राचा बहुतांश भाग मान्सूनच्या धारांनी ओलाचिंब होत असताना एकही सरदेखील या गावांच्या हद्दीत धावून आलेली नाही. म्हणून जत तालुक्यातील बहुतांश गावांची मागणी आहे की सांगलीजवळून म्हैशाळ येथून सुरू होणाऱ्या उपजलसिंचन योजनेची व्याप्ती वाढवून आणि कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील शेतीला पाणी द्या, अशी मागणी वारंवार करूनही राज्यशासन दाद देत नाही. ही बहुतांश गावे कन्नड भाषिक आहेत. महाजन आयोगाच्या शिफरसीनुसार त्यांचा समावेश कर्नाटकात करावा, असेही म्हटले होते. मात्र, या आयोगाच्या शिफारसीच मान्य न झाल्याने सर्व काही जैसे थे राहिले. आता या गावांच्या लोकांचा संताप तीव्र झाला आहे. शेती पिकत नाही, जवळपास कारखानदारी नाही, एखादे मोठे शहर नाही, सर्व काही शंभर-सव्वाशे किलोमीटरवर आहे. मध्यंतरी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे पाणी देण्याची तयारी दर्शविली होती. पण त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेऊन बोलणी करायला हवी. विजापूर किंवा बागलकोट जिल्ह्यातून या गावांना पाणी देता येईल का? याचा विचार व्हायला हवा. कारण महाराष्ट्रातील पाणी असलेली कृष्णा नदी सव्वाशे किलोमीटरवर आहे. कन्नड भाषिक गावे असल्याने कर्नाटकात जातो, म्हटल्यावर त्याचा अर्थ वेगळा निघू शकतो. महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाच्या संघर्षाची धार तीव्र होते. पण त्यांची मागणी किंवा संताप हा भाषिक नाही त्या गावांचा विकास होण्यासाठी कोणत्याही आशेचा किरण दिसत नाही. आजही या घटकेला ही गावे टॅँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवित असतील तर संताप येणे साहजिकच आहे. भाषेचा वाद किंवा सीमा वाद बाजूला सारून या गावांचा विकास होण्यासाठी पावले उचलायला हवीत. कर्नाटकात जातो म्हणताच शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते आणि विजय शिवतारे यांनी या गावच्या सरपंच तसेच इतर पदाधिकाऱ्यांना कोल्हापुरात नुकतेच बोलावून घेऊन स्वतंत्र बैठक घेतली. म्हैशाळ उपसा पाणी योजनेद्वारे व कृष्णेचे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे. ही योजना गेली तीस वर्षे पूर्ण होत आहे. ती क्षमतेने चालत नाहीत. नदीपात्रापासून सव्वाशे किलोमीटरवरील गावांना पाणी देणे शक्य आहे का? याचा गांभीर्याने विचार व्हावा. गरज पडल्यास कर्नाटकाची मदत घ्यावी. यासाठीच तालुका हा घटक पकडून सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. त्यांची व्यथा समजून घ्यावी.