शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त झाले मलयुक्त - सावंत

By admin | Updated: September 11, 2015 03:01 IST

जलयुक्त शिवार योजना राबवताना ई-निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय धाब्यावर बसवण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : जलयुक्त शिवार योजना राबवताना ई-निविदा मागवण्याचा सरकारचा निर्णय धाब्यावर बसवण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. सावंत म्हणाले की, राज्यातील भाजपाचे सरकार हे भ्रष्टाचारमुक्त नव्हे, तर भ्रष्टाचारयुक्त सरकार आहे. त्यामुळे सरकारची जलयुक्त शिवार योजना ही मलयुक्त शिवार योजना झाली आहे. जनहिताच्या गोष्टी करतानाही भाजपाच्या मनात पाप आहे. त्यामुळेच या योजनेकरिता ई-निविदा मागवण्यात आल्या नाहीत. ५ हजार गावांना पाण्याच्या दुर्भिक्षापासून वाचवण्याकरिता जलयुक्त शिवार योजना सुरू केली गेली. जलयुक्त शिवार योजनेत १६ ते १८ लाख रुपये खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात २५ हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केलेली नाही. संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले तर त्यांचे बोलवते धनी कोण ते स्पष्ट होईल, असेही सावंत म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)