शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता मिळताच झोपड्यांचा प्रश्न सोडवू

By admin | Updated: October 7, 2014 05:43 IST

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे

डोंबिवली/कल्याण : महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे. त्यामुळे संबंधित परप्रांतीय येथील घरे विकून आजमगढ, प्रतापगढ आदी ठिकाणी स्थिरावतात. हे चित्र नको असेल तर मला सत्ता दिल्यास सत्तेच्या पहिल्याच दिवशी झोपडपट्ट्यांचा विषय निकाली लावेन, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. भाषणाच्या शुभारंभाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवलीतील डीएनसीच्या मैदानातील सभेत त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील युवक-युवतींनाच रोजगाराची संधी देण्यात येईल. परप्रांतीयांनी येथून त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जावे. त्यांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही. आपण त्यांना सर्व सुविधा द्यायला, हा काय कबुतरांचा खुराडा आहे का, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीयांवर टीकेची झोड उठवली. राज्यात ५५ वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांनी आतापर्यंत ना रस्ते दिले, ना अखंड वीज दिली. केवळ खड्डेमुक्त रस्त्यांचा नारा दिला. त्याची पूर्तता करण्यासाठी काय रॉकेट सायन्स आहे का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात दंग आहेत, ही शोकांतिका नाही का? देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराला येतो, यावरूनच येथील त्या पक्षाच्या नेत्यांची काहीही लायकी नाही, असे स्पष्ट होत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते, असे खुद्द मोदींनीच बीडच्या सभेत स्पष्ट केले. आता आगामी काळात कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या महापालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका होत आहेत. त्यालाही पंतप्रधान येतील. केवळ पक्ष प्रचारासाठी पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून हिंडणारा अशी त्यांची जागतिक कीर्तीची ख्याती होत आहे. मोदींनी कितीही सभा घेवो, मला त्याची फिकीर नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाच्या होर्डिंग्जवर मोदींचा फोटो लावावा लागतो, ही त्यांच्या येथील नेत्यांची शोकांतिका असल्याची टीका त्यांनी केली.महायुतीसह आघाडीच्या फुटीबाबतही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे सर्व प्री-प्लॅन होते. मात्र जनतेला नेहमीप्रमाणेच फसवले गेले. त्यांना या वेळेसही गृहीत धरले गेले आणि म्हणूनच महायुती तुटली की आघाडी तुटणार, हे समीकरण सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.(प्रतिनिधी)