शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

सत्ता मिळताच झोपड्यांचा प्रश्न सोडवू

By admin | Updated: October 7, 2014 05:43 IST

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे

डोंबिवली/कल्याण : महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत झोपड्यांचा प्रश्न जटिल होत आहे. माहितीप्रमाणे बीकेसीमधील एका झोपडीची किंमत एक कोटींच्या घरात आहे. त्यामुळे संबंधित परप्रांतीय येथील घरे विकून आजमगढ, प्रतापगढ आदी ठिकाणी स्थिरावतात. हे चित्र नको असेल तर मला सत्ता दिल्यास सत्तेच्या पहिल्याच दिवशी झोपडपट्ट्यांचा विषय निकाली लावेन, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. भाषणाच्या शुभारंभाला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरपूस समाचार घेतला. डोंबिवलीतील डीएनसीच्या मैदानातील सभेत त्यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ता दिल्यास महाराष्ट्रातील युवक-युवतींनाच रोजगाराची संधी देण्यात येईल. परप्रांतीयांनी येथून त्यांच्या त्यांच्या ठिकाणी जावे. त्यांना या ठिकाणी रोजगार मिळणार नाही. आपण त्यांना सर्व सुविधा द्यायला, हा काय कबुतरांचा खुराडा आहे का, अशा शब्दांत त्यांनी परप्रांतीयांवर टीकेची झोड उठवली. राज्यात ५५ वर्षे ज्यांची सत्ता आहे त्यांनी आतापर्यंत ना रस्ते दिले, ना अखंड वीज दिली. केवळ खड्डेमुक्त रस्त्यांचा नारा दिला. त्याची पूर्तता करण्यासाठी काय रॉकेट सायन्स आहे का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.सीमेवर जवान शहीद होत असताना मोदी महाराष्ट्रात प्रचार करण्यात दंग आहेत, ही शोकांतिका नाही का? देशाचा पंतप्रधान महाराष्ट्रातील भाजपाच्या प्रचाराला येतो, यावरूनच येथील त्या पक्षाच्या नेत्यांची काहीही लायकी नाही, असे स्पष्ट होत आहे. स्व. गोपीनाथ मुंडे असते तर मला महाराष्ट्रात प्रचाराला यावे लागले नसते, असे खुद्द मोदींनीच बीडच्या सभेत स्पष्ट केले. आता आगामी काळात कल्याण-डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या महापालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा आदींच्या निवडणुका होत आहेत. त्यालाही पंतप्रधान येतील. केवळ पक्ष प्रचारासाठी पंतप्रधान कार्यालय बंद ठेवून हिंडणारा अशी त्यांची जागतिक कीर्तीची ख्याती होत आहे. मोदींनी कितीही सभा घेवो, मला त्याची फिकीर नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाच्या होर्डिंग्जवर मोदींचा फोटो लावावा लागतो, ही त्यांच्या येथील नेत्यांची शोकांतिका असल्याची टीका त्यांनी केली.महायुतीसह आघाडीच्या फुटीबाबतही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे सर्व प्री-प्लॅन होते. मात्र जनतेला नेहमीप्रमाणेच फसवले गेले. त्यांना या वेळेसही गृहीत धरले गेले आणि म्हणूनच महायुती तुटली की आघाडी तुटणार, हे समीकरण सहा महिन्यांपूर्वीच ठरल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.(प्रतिनिधी)