शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

सून म्हणते, पावसासाठी दिला सासऱ्याचा बळी

By admin | Updated: July 16, 2014 01:12 IST

‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात

गावकऱ्यांपुढे कबुली : नारळी येथील अंध सासऱ्याचे खून प्रकरणदेवानंद पुजारी - फुलसावंगी (यवतमाळ) ‘पाणी कोणी आये कारण म धार दिनी’ असे हातात कुऱ्हाड असलेली पंचफुला गावकऱ्यांना ओरडून सांगत होती. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरीही चक्रावून गेले. घरात जाऊन बघितले तर सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उमरखेड तालुक्यातील नारळी येथे रविवारी रात्री घडलेल्या भीषण घटनेचे वास्तव गावकरी सांगत होते. प्रस्तुत प्रतिनिधीने नारळी गावाला भेट दिली तेव्हा घटनेचा थरार गावकरी कथन करीत होते. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावात पंचफुला गणेश राठोड परिवारासह राहते. पती, मुलगा शंकर आणि दक्षता व संतोषी या दोन मुली असा परिवार आहे. सोबतच अंध सासरा वसरामही राहत होता. रविवारी सायंकाळी ५.३० वाजता गाव नेहमीप्रमाणे व्यस्त होते. तेवढ्यात रक्ताने माखलेली कुऱ्हाड हातात घेऊन पंचफुला घराबाहेर आली. तिचा हा रुद्रावतार पाहून गावकरी क्षणभर स्तब्ध झाले. ती गोरमाटी भाषेतून पाऊस येण्याकरिता आपल्या सासऱ्याचा बळी दिल्याचे गावकऱ्यांपुढे म्हणत होती.ग्रामीण भागात नैसर्गिक आपत्तीत पशुबळी देण्याची प्रथा आहे. गावकऱ्यांनाही नेमके हेच वाटले. परंतु घरात जाऊन पाहिले तर चक्क तिचा अंध असलेला वृद्ध सासरा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. काही वेळातच पंचफुलाच्या घरासमोर गर्दी झाली. तिच्या हातून आणखी काही अनिष्ट घडेल म्हणून गावकऱ्यांनी तिला शिताफीने पकडले. कुऱ्हाड ताब्यात घेऊन तिला दोराच्या साहाय्याने निंबाच्या झाडाला बांधून ठेवले. त्यानंतर सरपंच सुभाष राठोड यांनी घटनेची माहिती बिटरगाव पोलिसांना दिली. विशेष म्हणजे, राठोड कुटुंब मूळचे महागाव तालुक्यातील मुडाणा येथील रहिवासी आहे. मात्र २० वर्षापूर्वी पंचफुलाचे मानसिक संतुलन ढळल्याने संपूर्ण कुटुंब नारळी येथे वास्तव्यास आले. दरम्यान नांदेड येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.मुलमुले यांच्याकडे पंचफुलावर उपचार करण्यात आले. ती पूर्णपणे बरी झाली. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून पंचफुलाचे मानसिक संतुलन पुन्हा ढासळले होते.आषाढी पौर्णिमेच्या दिवशी परिसरात पावसासाठी पशुबळी दिले जात असल्याचे सांगितले जाते. हा प्रकार पंचफुलाने बघितला असावा. आणि त्यातूनच ही दुर्दैवी घटना घडली असावी, असा गावकऱ्यांचा कयास आहे.