शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

लढाईपूर्वीच काहींनी सोडले होते मैदान नारायण राणेंचा आरोप

By admin | Updated: November 5, 2014 04:46 IST

काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते

मुंबई : काही काँग्रेस नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मैदान सोडून दिले होते. त्यांनी काम करणेही बंद केले होते. पराभूत मानसिकतेत अनेक जण होते, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज केला. राणे यांनी नावे सांगण्यास नकार दिला; पण काँग्रेस श्रेष्ठींना अहवाल पाठवू, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणे आज पहिल्यांदाच गांधी भवनात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावनांना वाट करून दिली. काँग्रेस उमेदवारांना पुरविण्यासाठी आलेल्या रकमेपैकी १० कोटींची चोरी झाल्याच्या वृत्ताबाबत माहिती नाही, असे सांगत उमेदवारांना पैसे पोहोचविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर होती, असा सूचक इशाराही त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केला. उमेदवारांना पक्षातर्फे पुरेसा निधी का पोहोचला नाही, साधनसामुग्री का पुरविली गेली नाही आणि नीट प्रचारसभादेखील का देण्यात आल्या नाहीत, याची चौकशी काँग्रेस श्रेष्ठींनी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राणे यांनी केली.काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक ६ नोव्हेंबरला होणार आहे. सध्या चर्चेतील एकाही नेत्याला काँग्रेसचा नेता म्हणून निवडू नये, असे सांगत राणेंनी एकप्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांनाच लक्ष्य केले. आघाडी तुटली तेव्हाच दोन्ही पक्षांचा पराभव आपल्याला दिसला होता, असेही ते म्हणाले. प्रचार समितीचा प्रमुख म्हणून पराभवाची नैतिक जबाबदारी आपलीही आहे, असे ते म्हणाले.