शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

आणखी काही वर्षे सोसा हालअपेष्टा

By admin | Updated: August 25, 2014 03:39 IST

वीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले

सुशांत मोरे, मुंबईवीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या   कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. एकच रेल्वेमार्ग असल्याने अशा घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दुहेरी मार्गाची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. मात्र दुहेरी मार्गाचा केवळ सर्व्हे पूर्ण झाला असून, त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर होणे बाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी काही वर्षे अशाच प्रकारच्या हालअपेष्टांना सामोर जावे लागणार आहे. पावसाळ्यात किंवा ऐन सणासुदीच्या दिवसांत कोकण रेल्वेमार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वेसेवा ठप्प होते. १४ एप्रिल रोजी संगमेश्वर-उक्शीदरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. यामुळे कोकण रेल्वे तब्बल २३ तासांनंतर पूर्ववत झाली. तर त्यानंतर ४ मे रोजी दिवा-सावंतवाडी ट्रेनला नागोठणेजवळ मोठा अपघात झाला. त्या वेळीही कोकण रेल्वे १९ तासांनंतर पूर्ववत झाली. करंजाडीजवळ झालेला या मार्गावरील तिसरा अपघात आहे. अपघातानंतर रेल्वेसेवा अंशत: सुरूच ठेवण्यासाठी दुहेरी मार्ग आवश्यक आहे. मात्र दुहेरी मार्ग नसल्याने अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होतो. दरम्यान, मध्य रेल्वेने त्यांच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम हाती घेतले असून, पेण ते कासू साधारण चार महिन्यांत तर कासू ते रोहापर्यंत साधारण सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतरचा टप्पा हा कोकण रेल्वेचा असून कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण केले जाणार आहे. हे दुहेरीकरण संपूर्ण न करता टप्प्याटप्यात केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि त्याचा अहवाल बनवून रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. मात्र यासाठी निश्चित कालावधी ठरवला नसल्याने कोकणवासीयांच्या हालअपेष्टा आणखी काही वर्षे सुरूच राहतील, हेच दिसून येते.