शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

आणखी काही वर्षे सोसा हालअपेष्टा

By admin | Updated: August 25, 2014 03:39 IST

वीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले

सुशांत मोरे, मुंबईवीर ते करंजाडीदरम्यान रविवारी मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले आणि गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी जाणा-या   कोकणवासीयांना मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. एकच रेल्वेमार्ग असल्याने अशा घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प होणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दुहेरी मार्गाची मागणी गेली कित्येक वर्षे होत आहे. मात्र दुहेरी मार्गाचा केवळ सर्व्हे पूर्ण झाला असून, त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर होणे बाकी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकणवासीयांना आणखी काही वर्षे अशाच प्रकारच्या हालअपेष्टांना सामोर जावे लागणार आहे. पावसाळ्यात किंवा ऐन सणासुदीच्या दिवसांत कोकण रेल्वेमार्गावर एखादी दुर्घटना घडल्यास रेल्वेसेवा ठप्प होते. १४ एप्रिल रोजी संगमेश्वर-उक्शीदरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. यामुळे कोकण रेल्वे तब्बल २३ तासांनंतर पूर्ववत झाली. तर त्यानंतर ४ मे रोजी दिवा-सावंतवाडी ट्रेनला नागोठणेजवळ मोठा अपघात झाला. त्या वेळीही कोकण रेल्वे १९ तासांनंतर पूर्ववत झाली. करंजाडीजवळ झालेला या मार्गावरील तिसरा अपघात आहे. अपघातानंतर रेल्वेसेवा अंशत: सुरूच ठेवण्यासाठी दुहेरी मार्ग आवश्यक आहे. मात्र दुहेरी मार्ग नसल्याने अपघातानंतर वाहतुकीचा खोळंबा होतो. दरम्यान, मध्य रेल्वेने त्यांच्या मार्गावर दुहेरीकरणाचे काम हाती घेतले असून, पेण ते कासू साधारण चार महिन्यांत तर कासू ते रोहापर्यंत साधारण सहा ते आठ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतरचा टप्पा हा कोकण रेल्वेचा असून कोकण रेल्वेकडून कोलाड ते ठोकूर या ७४१ किलोमीटरच्या मार्गावर दुहेरीकरण केले जाणार आहे. हे दुहेरीकरण संपूर्ण न करता टप्प्याटप्यात केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सध्या या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल आणि त्याचा अहवाल बनवून रेल्वे बोर्डाला सादर केला जाईल. मात्र यासाठी निश्चित कालावधी ठरवला नसल्याने कोकणवासीयांच्या हालअपेष्टा आणखी काही वर्षे सुरूच राहतील, हेच दिसून येते.