शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नगरपालिकांच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

राज्यातील नगरपालिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याची विनंती नगरपरिषद महासंघाने केली आहे

मुंबई : राज्यातील नगरपालिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घालण्याची विनंती नगरपरिषद महासंघाने केली आहे. महासंघाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात विनंती करण्याचा निर्णय राज्यातील नगराध्यक्षांच्या परिषदेत घेण्यात आला. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे महासंचालक आणि परिषदेचे तज्ज्ञ सल्लागार रणजित चव्हाण यांनी अंधेरी (पश्चिम) येथील संस्थेच्या सभागृहात परिषदेचे आयोजन केले होते.दीपप्रज्वलनाद्वारे महासंघाचे अध्यक्ष आणि खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर यांनी उद्घाटन केले. याप्रसंगी संस्थेचे महासंचालक रणजित चव्हाण, महासंघाचे सरचिटणीस आणि आंबेजोगईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, संस्थेचे मानद संचालक लक्ष्मणराव लटके, तज्ज्ञ सल्लागार अद्वैत औधकर यांच्यासह राज्यातील अनेक ठिकाणचे नगराध्यक्ष उपस्थित होते.नगरपालिकांना भेडसावणार्‍या अनेक समस्यांचा यावेळी ऊहापोह करण्यात आला. त्यात नगरसेवकांचा भत्ता, मानधन वाढावे, नगरपरिषदांना आर्थिक मंजुरी मर्यादेत वाढ करावी, महासंघाच्या बैठकांना उपस्थित राहणार्‍या नगराध्यक्षांना प्रवासभत्ता मिळावा, महिला व बालकल्याण सभापती व महिला सदस्यांना वाढीव सभा भत्ता मिळावा, जिल्हा नियोजन विकास समितीत २५ टक्के निधी नागरी क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात यावा, मंत्रालयात कामासाठी येणार्‍या नगराध्यक्षांना प्रवेशासाठी विशेष पास उपलब्ध करून द्यावा, नगरपरिषदांवर असणारा महसूल खात्याचा अंकुश काढण्यात यावा, शासनाच्या यूडी-६ या योजनेतून विविध नगरपरिषदांना १०० टक्के अनुदान मिळावे, या विषयांवर परिषदेत सविस्तर चर्चा झाली.