शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वीजदरवाढीवर तोडगा निघणार !

By admin | Updated: March 14, 2015 05:38 IST

राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही

मुंबई : राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नी येत्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, प्रसंगी बैठक बोलावू आणि मार्ग काढून अंतिम निर्णय घडवून आणू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीसह महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.राज्यातील वीजदरवाढ प्रश्नावर वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाची शिवसेना भवनात शुक्रवारी बैठक झाली. समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, बुनकर फेडरेशनचे अध्यक्ष फैजान आझमी, महाराष्ट्र चेंबरचे अनिल गचके आणि अन्य विविध उद्योजक व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी शिष्टमंडळाचे विजेबाबतचे प्रश्न समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केली.राज्यातील वीज घोटाळा हा सिंचन घोटाळ्यापेक्षा अधिक मोठा आणि गंभीर आहे. अकार्यक्षमता, अवाढव्य भांडवली खर्च, प्रचंड वितरण गळती आणि भ्रष्टाचारामुळे स्थिती गंभीर बनली आहे. वीजदरवाढीमुळे कोल्हापूर, सांगली, ठाणे, नागपूर, चंद्रपूर येथील उद्योजक कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत स्थलांतरित होत आहेत. यावर मार्ग काढण्यात आला नाही तर राज्याचे नुकसान होईल, आदी बाबी शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिल्या. यावर शिवसेनेकडून वीजप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. तथापि अंतिम व स्पष्ट निर्णय होत नसल्याने उद्योजक व यंत्रमागधारकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनाची माहिती या वेळी प्रताप होगाडे यांनी दिली. शिवाय तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)