शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

वीजदरवाढीवर तोडगा निघणार !

By admin | Updated: March 14, 2015 05:38 IST

राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही

मुंबई : राज्यातील वीजग्राहक, उद्योजक आणि यंत्रमागधारकांचे वीजदर नियंत्रित ठेवणे हे केवळ ग्राहकांच्या हिताचे नाही, तर राज्याच्या विकासाच्या दृष्टीनेही आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नी येत्या मंगळवारपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, प्रसंगी बैठक बोलावू आणि मार्ग काढून अंतिम निर्णय घडवून आणू, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीसह महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाला दिले.राज्यातील वीजदरवाढ प्रश्नावर वीजग्राहक व औद्योगिक संघटना राज्यस्तरीय समन्वय समिती आणि महाराष्ट्र राज्य बुनकर फेडरेशनच्या शिष्टमंडळाची शिवसेना भवनात शुक्रवारी बैठक झाली. समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, बुनकर फेडरेशनचे अध्यक्ष फैजान आझमी, महाराष्ट्र चेंबरचे अनिल गचके आणि अन्य विविध उद्योजक व यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बैठकीदरम्यान जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी शिष्टमंडळाचे विजेबाबतचे प्रश्न समजावून घेत त्यांच्याशी चर्चा केली.राज्यातील वीज घोटाळा हा सिंचन घोटाळ्यापेक्षा अधिक मोठा आणि गंभीर आहे. अकार्यक्षमता, अवाढव्य भांडवली खर्च, प्रचंड वितरण गळती आणि भ्रष्टाचारामुळे स्थिती गंभीर बनली आहे. वीजदरवाढीमुळे कोल्हापूर, सांगली, ठाणे, नागपूर, चंद्रपूर येथील उद्योजक कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत स्थलांतरित होत आहेत. यावर मार्ग काढण्यात आला नाही तर राज्याचे नुकसान होईल, आदी बाबी शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिल्या. यावर शिवसेनेकडून वीजप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. तथापि अंतिम व स्पष्ट निर्णय होत नसल्याने उद्योजक व यंत्रमागधारकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळे सुरू असलेल्या राज्यस्तरीय आंदोलनाची माहिती या वेळी प्रताप होगाडे यांनी दिली. शिवाय तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)