शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारबंदी विरोधात एकवटले

By admin | Updated: April 8, 2015 01:46 IST

राज्यघटनेने देशातील जनतेला भाषा, वेषभूषा, भोजन आणि भुवन हे मूलभूत अधिकार प्रदान केले असताना राज्यात गोवंशहत्या बंदीपाठोपाठ कोंबड्या

मुंबई : राज्यघटनेने देशातील जनतेला भाषा, वेषभूषा, भोजन आणि भुवन हे मूलभूत अधिकार प्रदान केले असताना राज्यात गोवंशहत्या बंदीपाठोपाठ कोंबड्या, बकरे, मासे खाण्यावरही टप्प्याटप्प्याने बंदी करण्याबाबत राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी मुंबई उच्च न्यायालयात केलेले विधान हे मूलभूत अधिकारांचा संकोच करणारे आहे, असे मत बहुतांश सदस्यांनी व्यक्त केल्याने विधान परिषदेत मांसाहारावर सर्वपक्षीय एकमत असल्याचे चित्र दिसले.शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हा विषय उपस्थित केला. शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी असून, राज्यातील मांसाहार बंद करण्याची सरकारची भूमिका आहे का हे स्पष्ट झाले पाहिजे. याच विषयावर शेकापच्या जयंत पाटील यांनी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पाटील म्हणाले की, सभागृह सुरू असताना धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यापूर्वी सरकारने सभागृहाला विश्वासात घेणे गरजेचे असते. मात्र गोवंशहत्या बंदीच्या न्यायालयीन प्रकरणात राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलने असे परस्पर धोरण जाहीर करणे योग्य नाही. आपल्याला दररोज सकाळी भाकरीसोबत मांसाहार करावा लागतो. अ‍ॅडव्होकेट जनरल यांचे विधान ऐकल्यापासून काल रात्री आपल्याला झोप लागली नाही, असे पाटील म्हणाले. याच न्यायाने कांदा, लसूण सेवनावरही बंदी आणणार का, अशी विचारणाही त्यांनी केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारने संपूर्ण शाकाहार हे धोरण स्वीकारले तर कुक्कुटपालक, कोळी, खाटीक समाज यांच्या रोजीरोटीची पर्यायी व्यवस्था सरकार करणार आहे का ते स्पष्ट झाले पाहिजे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे म्हणाले की, सभागृहातील ८५ टक्के सदस्य मांसाहार करतात. त्यामुळे मांसाहारावर बंदी आणण्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आता काय खावे हेही सरकार ठरवणार का, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, काही विशिष्ट लोक सरकारच्या पाठीशी उभे असल्याने त्यांना खूश करण्याकरिता सरकार हा निर्णय घेत आहे हे योग्य नाही. (विशेष प्रतिनिधी)