शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
2
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
3
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
4
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
5
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
6
'नमस्कार फ्रॉम स्पेस; तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video
7
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
8
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
9
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
10
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
11
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
12
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
13
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!
14
"कॉम्प्रोमाइज कर तुला रोल देतो", टीव्ही अभिनेत्याला दिग्दर्शकाने दिलेली ऑफर, केला धक्कादायक खुलासा
15
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
16
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
17
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
18
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
19
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
20
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा

‘मिहान’च्या दूरवस्थेला आघाडीच जबाबदार

By admin | Updated: November 24, 2014 01:21 IST

विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे

नितीन गडकरींचा आरोप : पृथ्वीराज चव्हाणांसोबत रंगली जुगलबंदीनागपूर : विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे असा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. दुसरीकडे भाजपकडून आमच्याच कार्यकाळातले प्रकल्प नव्याने घोषणा करून आणल्या जात असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट) सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेन्ट’ या चर्चासत्रादरम्यान या दोन्ही नेत्यांची निरनिराळ््या मुद्यांवर चांगलीच जुगलबंदी उपस्थितांना अनुभवायला मिळाली. विधानसभा निवडणुकांदरम्यान केलेले आरोप-प्रत्यारोप बाजूला सारत गडकरी व चव्हाण पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले होते.सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चासत्रात या दोन्ही दिग्गज नेत्यांनी निरनिराळ््या मुद्यांवर परखड मत व्यक्त केले. एखाद्या प्रश्नावर समोरच्याला प्रत्युत्तर देणे, मध्येच एखाद्या वाक्यावर चिमटा काढणे आणि दावे-प्रतिदावे यामुळे चर्चासत्र चांगलेच रंगले. येणाऱ्या काळातील राजकारण हे विकासाधिष्ठितच राहील असे मत दोघांनीही यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र परिख, सचिव राहुल उपगंलावार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेद’चे माजी अध्यक्ष विलास काळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. ...तर अविश्वास प्रस्ताव आणाभाजपकडे बहुमत नसतानादेखील १२ नोव्हेंबर रोजी विधानसभेत आवाजी मतदानाच्या आड झालेला प्रकार हा चुकीचा होता. राज्यातील सरकार हे अवैध आहे. न्यायालयात आम्ही याला आव्हान दिले आहे. भाजपला बहुमत सिद्ध करावेच लागेल असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावर काँग्रेसने नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अविश्वास प्रस्ताव आणावाच असे आव्हान गडकरी यांनी दिले. कोणाच्या आरोपावरून राज्य सरकार अवैध ठरत नाही. जे आरोप करतात त्यांनी उघडपणे सामना करावा. एकदाची कुस्ती होऊन जाऊच द्या या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले.संघाचा हस्तक्षेप नाहीसंघाच्या इशाऱ्यांवर केंद्राचे सरकार चालते अशी टीका चव्हाण यांनी केली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे अशी टीका करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात संघाकडून कधीही राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येत नाही. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत कधीही कुठलाही आदेश देत नाहीत असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केली. भ्रष्टाचार अन् आघाडीमुळे फटकाकेंद्र व राज्यात संपुआ तसेच आघाडी सरकारने कधीही झाली नाहीत इतकी विकासकामे केली. परंतु भ्रष्टाचाराची समोर आलेली प्रकरणे, आकडेवारी तसेच आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसला फटका बसला. माहितीच्या अधिकारातून बरेचसे भ्रष्टाचार समोर आले व त्यातून जनता आणि विशेषत: युवावर्गाने आम्हाला नाकारले असे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केले. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती दोषी सिद्ध झाली तर कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु लवकर निर्णय येत नाही व त्यामुळे अशा लोकांमध्ये कायद्याबाबत भीतीच नाही असेदेखील ते म्हणाले. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काही कायद्यांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. तुम्ही केलेला विकास जनतेला बहुतेक दिसलाच नाही या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना चिमटा काढला.