शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

‘मिहान’च्या दूरवस्थेला आघाडीच जबाबदार

By admin | Updated: November 24, 2014 01:21 IST

विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे

नितीन गडकरींचा आरोप : पृथ्वीराज चव्हाणांसोबत रंगली जुगलबंदीनागपूर : विदर्भ विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी ‘मिहान’चा योग्य उपयोग करता आला असता. परंतु या अगोदर सत्तेवर असणाऱ्या आघाडी शासनाच्या हलगर्जीमुळे ‘मिहान’ची दुरवस्था झाली आहे असा आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केला. दुसरीकडे भाजपकडून आमच्याच कार्यकाळातले प्रकल्प नव्याने घोषणा करून आणल्या जात असल्याचे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले. ‘वेद’तर्फे (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेन्ट) सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘पॉलिटिक्स आॅफ डेव्हलपमेन्ट’ या चर्चासत्रादरम्यान या दोन्ही नेत्यांची निरनिराळ््या मुद्यांवर चांगलीच जुगलबंदी उपस्थितांना अनुभवायला मिळाली. विधानसभा निवडणुकांदरम्यान केलेले आरोप-प्रत्यारोप बाजूला सारत गडकरी व चव्हाण पहिल्यांदाच एका मंचावर एकत्र आले होते.सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चासत्रात या दोन्ही दिग्गज नेत्यांनी निरनिराळ््या मुद्यांवर परखड मत व्यक्त केले. एखाद्या प्रश्नावर समोरच्याला प्रत्युत्तर देणे, मध्येच एखाद्या वाक्यावर चिमटा काढणे आणि दावे-प्रतिदावे यामुळे चर्चासत्र चांगलेच रंगले. येणाऱ्या काळातील राजकारण हे विकासाधिष्ठितच राहील असे मत दोघांनीही यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र परिख, सचिव राहुल उपगंलावार हे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘वेद’चे माजी अध्यक्ष विलास काळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. ...तर अविश्वास प्रस्ताव आणाभाजपकडे बहुमत नसतानादेखील १२ नोव्हेंबर रोजी विधानसभेत आवाजी मतदानाच्या आड झालेला प्रकार हा चुकीचा होता. राज्यातील सरकार हे अवैध आहे. न्यायालयात आम्ही याला आव्हान दिले आहे. भाजपला बहुमत सिद्ध करावेच लागेल असे प्रतिपादन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावर काँग्रेसने नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान अविश्वास प्रस्ताव आणावाच असे आव्हान गडकरी यांनी दिले. कोणाच्या आरोपावरून राज्य सरकार अवैध ठरत नाही. जे आरोप करतात त्यांनी उघडपणे सामना करावा. एकदाची कुस्ती होऊन जाऊच द्या या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले.संघाचा हस्तक्षेप नाहीसंघाच्या इशाऱ्यांवर केंद्राचे सरकार चालते अशी टीका चव्हाण यांनी केली. त्यावर गडकरी यांनी तत्काळ जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजपवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘रिमोट कंट्रोल’ आहे अशी टीका करण्यात येते. परंतु प्रत्यक्षात संघाकडून कधीही राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यात येत नाही. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत कधीही कुठलाही आदेश देत नाहीत असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केली. भ्रष्टाचार अन् आघाडीमुळे फटकाकेंद्र व राज्यात संपुआ तसेच आघाडी सरकारने कधीही झाली नाहीत इतकी विकासकामे केली. परंतु भ्रष्टाचाराची समोर आलेली प्रकरणे, आकडेवारी तसेच आघाडीच्या राजकारणाचा काँग्रेसला फटका बसला. माहितीच्या अधिकारातून बरेचसे भ्रष्टाचार समोर आले व त्यातून जनता आणि विशेषत: युवावर्गाने आम्हाला नाकारले असे पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिपादन केले. भ्रष्टाचार करणारी व्यक्ती दोषी सिद्ध झाली तर कठोर शिक्षा व्हायला हवी. परंतु लवकर निर्णय येत नाही व त्यामुळे अशा लोकांमध्ये कायद्याबाबत भीतीच नाही असेदेखील ते म्हणाले. भ्रष्टाचार दूर करण्यासाठी काही कायद्यांमध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले. तुम्ही केलेला विकास जनतेला बहुतेक दिसलाच नाही या शब्दांत गडकरी यांनी चव्हाण यांना चिमटा काढला.