शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या दिशेने एकजरी टॉमहॉक मिसाईल आले...; दोन तेल कंपन्यांवर निर्बंध लादल्यावर पुतीन भडकले
2
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
3
'ऑपरेशन सिंदूर'चा व्हिडीओ दाखवून पाकिस्तान करतंय महिलांचा ब्रेनवॉश! दहशतवाद्यांचा भरतोय वर्ग
4
पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम
5
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
6
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
7
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
8
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
9
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
10
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
11
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
12
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
13
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
14
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
15
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
16
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
17
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
18
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
19
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
20
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय

'...तर राज्यातील सौरऊर्जा निर्मिती ठप्प होईल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 04:11 IST

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सौरऊर्जेची निर्मिती, वापर, मीटरिंग व बिलिंगबाबतचे नवीन प्रारूप विनियम सूचना व हरकतीसाठी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने सौरऊर्जेची निर्मिती, वापर, मीटरिंग व बिलिंगबाबतचे नवीन प्रारूप विनियम सूचना व हरकतीसाठी जाहीर केले आहे. जाहीर मसुद्यानुसार ३०० युनिट्सपर्यंत घरगुती वीज वापरासाठी नेट मीटरिंग लागू राहणार आहे. याचा अर्थ ग्राहकाने ३०० युनिट्सपेक्षा जास्त वीज वापरल्यास निर्माण केलेली वीज वितरण कंपनीस ३.६४ रुपये प्रति युनिट दराने द्यावी लागेल. ३०० युनिट्सपेक्षा जास्त वापरलेल्या विजेसाठी स्थिर आकार अधिक वीज आकार किमान ११.१८ रुपये प्रति युनिट वा त्याहून अधिक दराने वीजबिल भरावे लागेल. अडीच-तीन किलोवॅटच्या वर सौरऊर्जा निर्मिती कोणीही करणार नाही. त्यामुळे सौरऊर्जा निर्मिती ठप्प होईल, असे मत महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले.प्रश्न : तरतुदी जाचक व अन्यायकारक आहेत?उत्तर : सौरऊर्जा यंत्रणा जेथे उभी करावयाची ते छत वा ती जागा ग्राहकाची, यंत्रणा उभारणीचा सर्व खर्च व कर्जाचा बोजा गाहकावर, देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ग्राहकाची म्हणजे सर्व मालकी ग्राहकाची, पण निर्माण होणाऱ्या विजेवर मात्र मालकी महावितरण कंपनीची असे हे विनियम आहेत. घरगुती ग्राहकांना फक्त पहिली ३०० युनिट्स वीज वापरता येईल. त्यापेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यास ती महावितरण कंपनीस ३.६४ रुपये प्रति युनिट या स्थिर दराने २० वर्षांच्या कराराने द्यावी लागेल. ग्राहकाने ३०० युनिट्सपेक्षा अधिक वीज वापरल्यास जादा वापरलेल्या विजेचे सध्या अंदाजे १२/१३ रुपये प्रति युनिट व पुढे दरवर्षी वाढ होईल, त्या दराने बिल भरावे लागेल. अशी ही जाचक व अन्यायकारक तरतूद आहे.प्रश्न : दरवाढीचा फटका बसेल?उत्तर : घरगुती वगळता अन्य सर्व प्रकारच्या ग्राहकांना ३०० युनिट्सचीही सवलत नाही. त्यांना पहिल्या युनिटपासून सर्व वीज कंपनीस द्यावी लागेल. महागड्या आणि वेळोवेळी वाढणाºया दराने वीज घ्यावी लागेल. ग्राहकास कोणताही लाभ नाही. गुंतवणूक ग्राहकाची व फायदा कंपनीचा असे हे विनियम आहेत. त्यामुळे ग्राहक ही गुंतवणूक करणारच नाहीत. परिणामी, छतावरील ऊर्जा (रुफ टॉप सोलर) ही यंत्रणा पूर्णपणे नामशेष होईल. सध्या जे औद्योगिक वा अन्य वीजग्राहक सौरयंत्रणा व सौरऊर्जेचा स्ववापर करीत आहेत. त्या ग्राहकांनाही हे विनियम लागू होतील. त्या दिवसापासून नेट बिलिंग पद्धतीमुळे दरवाढीचा प्रचंड मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.वीजग्राहकांना कसा फटका बसेल?नवीन विनियमांचा प्रचंड फटका ३०० युनिट्सहून अधिक वीज वापरणारे घरगुती ग्राहक, तसेच सर्व व्यापारी, सार्वजनिक सेवा व प्रामुख्याने औद्योगिक ग्राहक यांना बसणार आहे. १ हजार केव्हीएपर्यंत विजेचा वापर करणारे अंदाजे ४ लाख औद्योगिक ग्राहक राज्यात आहेत. या ग्राहकांना स्वस्त वीज उपलब्ध करून घेण्याचा मार्ग कायमचा बंद होणार आहे. त्याचा परिणाम औद्योगिक विकासावर व पर्यायाने राज्याच्या हितावर होणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व सौरऊर्जा ग्राहक व विविध ग्राहक संघटनांनी १८ नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती आयोगाकडे दाखल कराव्यात. विरोध नोंदवावा.दबावाखाली निर्णय घेतला गेला आहे?देशामध्ये सौरऊर्जा उपलब्धता प्रचंड प्रमाणात आहे. सौरऊर्जेसाठी पाणी लागत नाही. कोणतेही पाणीप्रदूषण, वायुप्रदूषण व ग्रीन हाउस गॅसेस नाहीत. ही ऊर्जा पूर्णपणे पर्यावरण संरक्षक व पर्यावरणपूरक असतानाही केवळ वितरण कंपन्यांच्या दबावाखाली प्रदूषणपूरक निर्णय घेणे हे राज्य व देशहित विरोधी आहे. राज्यामध्ये आज सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये अंदाजे ५ हजार लघुउद्योग कार्यरत आहेत. त्यावर आधारित रोजगार अंदाजे १ लाख २० हजार आहेत. हे उद्योग बुडणार आहेत.