शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

तीन जिल्ह्यांसाठी सौर कृषिपंप

By admin | Updated: July 31, 2015 01:07 IST

जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत.

औरंगाबाद : जालना, बीड उस्मानाबाद जिल्ह्यांचा सौर कृषिपंप वाटप योजनेत समावेश करण्यात आला आहे. तत्काळ वीज जोडणी देणे शक्य नाही, अशांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. हे कृषिपंप फक्त विदर्भातील शेतकऱ्यांना देण्याचे धोरण युती सरकारने स्वीकारल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्याची दखल घेत योजनेत जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार ५८० शेतकऱ्यांना कृषिपंप देण्यात येतील. यंदा केंद्र सरकार देशात १ लाख सौर कृषिपंप वाटणार आहे. त्यासाठी ४०० कोटींची तरतूद केली आहे. राज्यात साडेसात हजार सौर कृषिपंपांसाठी केंद्र सरकार ३० टक्के अनुदानाप्रमाणे १३३ कोटी ५० लाख रुपये देणार आहे, तर राज्य सरकार पाच टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शेतकऱ्याला देणार आहे. पाच टक्के रक्कम लाभार्थी शेतकऱ्याने उभारावयाची आहे. उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे. जालना व बीडसाठी प्रत्येकी १९०, तर उस्मानाबादसाठी २०० सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)