शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

सामाजिक कार्यकर्तेही लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 06:02 IST

पर्यायी राजकारणाचा आग्रह; काँग्रेस प्रतिसाद देत नसल्याचा आरोप

- सुधीर लंके ।लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : देशातील सध्याचे सरकार परवडणारे नाही म्हणून सर्व लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष सामाजिक कार्यकर्त्यांनी व विविध घटकांनी थेट निवडणुकीच्या प्रचारात उतरुन पर्यायी राजकारण उभारावे, असा एक मतप्रवाह सुरु झाला आहे. या कार्यकर्त्यांच्या पुणे तसेच जालना, सांगली येथे काही बैठकाही झाल्या आहेत.

कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, पर्यावरणतज्ज्ञ विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, पारोमिता गोस्वामी, प्रतिभा शिंदे,चंदू चव्हाण, कुमार नागे, डॉ. मिलींद मुरुरकर, पल्लवी रेमणे, नंदू माधव, हेरंब कुलकर्णी यांसह विविध आघाड्यांवर काम करणारे कार्यकर्ते पुण्यातील बैठकीला उपस्थित होते. देशात मोदी सरकारच्या काळात लोकशाहीविरोधी प्रवृत्ती वाढल्या आहेत. याबाबत या सर्व कार्यकर्त्यांनी बैठकीत चिंता व्यक्त केली. केवळ बघ्याची भूमिका न घेता थेट निवडणुकीत उतरण्याची तयारी या कार्यकर्त्यांनी केली आहे.इतरांचा विचार का केला जात नाही?कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांच्यासोबत चर्चा केली आहे. काँग्रेस व राष्टÑवादीचे नेते पारंपरिक राजकीय गणितांमधून बाहेर येत नाहीत. घराणेशाही व धनिकांच्या पलीकडे जाऊन विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना विचारात घेताना दिसत नाही.