शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सौहार्दासाठी 'सोशल पीस फोर्स

By admin | Updated: July 28, 2014 12:40 IST

काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

पुणे : फेसबुकवर देवी-देवता, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर भावना तीव्र होतात. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होते. या प्रकारामागे कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे, याची साधी माहितीही न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते. काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे. 
फेसबुकवर शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज आणि देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यामध्ये दंगल उसळली. माथे भडकलेल्या तरुणांनी सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यातच एका मुस्लिम तरुणाचा काहीही दोष नसताना बळी गेला. तब्बल तीन आठवडे पुण्यामध्ये तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आणि काही सामाजिक संघटनांनी प्रयत्न करून शांतता प्रस्थापित केली. पण, आपला उद्देश सफल होत नाही म्हटल्यावर समाजकंटकांनी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकला. 
हे असेच सुरू राहिले आणि त्यावर समाजामधून हिंसक प्रतिक्रिया उमटत राहिल्या, तर समाजामध्ये अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे आपणच थांबवायला हवे, या विचारातून आयटीमध्ये काम करणारे आनंद शिंदे, जयदीप पठारे, अक्षय शिंदे, ऐश्‍वर्या पाटील, भास्कर नागमोडे, प्रमोद शेंडकर यांच्यासह काही तरुण एकत्र आले. 
सामाजिक कार्यकर्ते रवी घाटे यांच्या 'एम्पॉवर फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी 'सोशल पीस फोर्स' या नावाने फेसबुकवर पेज तयार केले. समाजामध्ये शांती नांदावी याकरिता तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. बघता बघता या पेजवर २८ हजार सभासद झाले. इंटरनेटचे जाळे अधिकाधिक विस्तारत चालले आहे. परंतु, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सामाजिक संतुलन बिघडवण्याचा अपप्रवृत्तींचा प्रयत्नाला लगाम घालण्याचे काम या ग्रुपने सुरू केले. 
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजसाठी केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले. केवळ फेसबुकवरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठीच हा ग्रुप नाही,तर इतर सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत. या तरुणांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली. या मदतीमधून ८00 गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकामासाठी फेसबुकने या ग्रुपला पुरस्कार दिला होता. फेसबुकने निवडलेल्या देशातील दोन ग्रुपपैकी 'एम्पॉवर फाउंडेशन' ही एक संस्था होती.
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजवर आता २८ हजार सभासद झाले आहेत. केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले.
तर पाच मिनिटांत मजकूर काढला जातो
■ फेसबुकवर कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा छायाचित्र, व्हिडिओ टाकण्यात आला असेल, तर तो काढून टाकण्यासाठी पोलिसांना २४ तास लागतात. परंतु फेसबुक वापरणार्‍या १ हजार ६00 लोकांनी जर 'रिपोर्ट स्पॅम' केले, तर हा मजकूर फेसबुकवरुन अवघ्या पाचच मिनिटांत काढून टाकण्यात येतो. जर असा आक्षेपार्ह मजकूर वेळेत काढून टाकण्यात आला, तर त्याचे लोण पसरू शकणार नाही.
 (प्रतिनिधी) ..