शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सामाजिक सौहार्दासाठी 'सोशल पीस फोर्स

By admin | Updated: July 28, 2014 12:40 IST

काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

पुणे : फेसबुकवर देवी-देवता, महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर भावना तीव्र होतात. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात होते. या प्रकारामागे कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे, याची साधी माहितीही न घेता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले जाते. काल्पनिक जगताचा वापर करून अविवेकी हिंसाचार घडविणार्‍या या प्रवृत्तींना त्यांच्याच भाषेत विवेकाने उत्तर देण्यासाठी पुण्यामध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन 'सोशल पीस फोर्स'नावाचा उपक्रम सुरू केला आहे. 
फेसबुकवर शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज आणि देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध झाल्यानंतर पुण्यामध्ये दंगल उसळली. माथे भडकलेल्या तरुणांनी सार्वजनिक आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. यातच एका मुस्लिम तरुणाचा काहीही दोष नसताना बळी गेला. तब्बल तीन आठवडे पुण्यामध्ये तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी आणि काही सामाजिक संघटनांनी प्रयत्न करून शांतता प्रस्थापित केली. पण, आपला उद्देश सफल होत नाही म्हटल्यावर समाजकंटकांनी पुन्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकला. 
हे असेच सुरू राहिले आणि त्यावर समाजामधून हिंसक प्रतिक्रिया उमटत राहिल्या, तर समाजामध्ये अराजक माजण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे आपणच थांबवायला हवे, या विचारातून आयटीमध्ये काम करणारे आनंद शिंदे, जयदीप पठारे, अक्षय शिंदे, ऐश्‍वर्या पाटील, भास्कर नागमोडे, प्रमोद शेंडकर यांच्यासह काही तरुण एकत्र आले. 
सामाजिक कार्यकर्ते रवी घाटे यांच्या 'एम्पॉवर फाउंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून तरुणांनी 'सोशल पीस फोर्स' या नावाने फेसबुकवर पेज तयार केले. समाजामध्ये शांती नांदावी याकरिता तरुणांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. बघता बघता या पेजवर २८ हजार सभासद झाले. इंटरनेटचे जाळे अधिकाधिक विस्तारत चालले आहे. परंतु, तंत्रज्ञानाचा गैरवापर करून सामाजिक संतुलन बिघडवण्याचा अपप्रवृत्तींचा प्रयत्नाला लगाम घालण्याचे काम या ग्रुपने सुरू केले. 
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजसाठी केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले. केवळ फेसबुकवरचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठीच हा ग्रुप नाही,तर इतर सामाजिक उपक्रमही राबवले जात आहेत. या तरुणांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली. या मदतीमधून ८00 गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. याकामासाठी फेसबुकने या ग्रुपला पुरस्कार दिला होता. फेसबुकने निवडलेल्या देशातील दोन ग्रुपपैकी 'एम्पॉवर फाउंडेशन' ही एक संस्था होती.
फेसबुकवरील या ग्रुपच्या पेजवर आता २८ हजार सभासद झाले आहेत. केवळ एक महिन्यामध्ये २८ हजार सभासद सामाजिक सलोख्यासाठी पुढे आले आहेत. ज्या मार्गाने हल्ला होतो आहे त्याच मार्गाने त्याला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. फेसबुकवरच्या हिंसाचाराला फेसबुकद्वारेच विवेकी उत्तर द्यायला हवे, त्याचा वास्तविक जीवनावर परिणाम होता कामा नये, अशी ग्रुपची धारणा असल्याचे रवी घाटे यांनी सांगितले.
तर पाच मिनिटांत मजकूर काढला जातो
■ फेसबुकवर कोणताही आक्षेपार्ह मजकूर किंवा छायाचित्र, व्हिडिओ टाकण्यात आला असेल, तर तो काढून टाकण्यासाठी पोलिसांना २४ तास लागतात. परंतु फेसबुक वापरणार्‍या १ हजार ६00 लोकांनी जर 'रिपोर्ट स्पॅम' केले, तर हा मजकूर फेसबुकवरुन अवघ्या पाचच मिनिटांत काढून टाकण्यात येतो. जर असा आक्षेपार्ह मजकूर वेळेत काढून टाकण्यात आला, तर त्याचे लोण पसरू शकणार नाही.
 (प्रतिनिधी) ..