शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

सोशल मीडियामुळे मुलाचा चार तासांत शोध

By admin | Updated: May 31, 2016 19:06 IST

आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली.

ऑनलाइन लोकमत
नारायणगाव, दि. 31 -  आईला वाटले वडिलांनी घरी नेले, तर वडिलांना वाटले आईबरोबर आहे, या गैरसमजातून चार तास आपल्या पालकांपासून ताटातूट झालेला मुलगा सोशल मीडियामुळे भेटला. ही घटना नारायणगाव येथे घडली. 
याबाबत माहिती अशी, हिवरेतर्फे नारायणगाव (ता. जुन्नर) येथील अतिश पांडुरंग शिंदे (वय ३०) व त्यांची पत्नी भावना (वय २५) हे दुपारी १२ वाजता आपला मुलगा संग्राम (वय ३) यांच्यासह नारायणगाव येथे कामानिमित्त आले होते. काम उरकल्यानंतर मोबाइल फोनच्या नादात अतिश शिंदे मोटारसायकल घेऊन पुन्हा गावी हिवरे येथे परतले. त्याच वेळी मुलगा संग्राम हा थोडा बाजूला गेला व त्याच्या आईला वाटले की, संग्रामला त्याच्या वडिलांनी घरी नेले. मात्र प्रत्यक्ष संग्राम तेथेच रडत राहिला. संग्रामला रडताना पाहून फळविक्रेते गजानन कोंडाजी दरेकर व सुरेश रामचंद्र बनकर यांनी त्याच्याजवळ विचारपूस केली; मात्र तो रडायचा थांबेना. हे पाहून महेंद्र खेबडे, चेतन पडघम व किरण वाजगे यांनी या बालकाची माहिती सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांना दिली. त्यानुसार मुजावर यांनी ट्रॅफिक आॅर्डन गणेश बेल्हेकर यांना संबंधित बालकाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. तोपर्यंत बाळाचे फोटो वाजगे, खेबडे यांनी व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल केले. 
या दरम्यान नारायणगाव बसस्थानकात हेमंत वारूळे यांनी बालकाविषयी बसस्थानकातील ध्वनिक्षेपकाद्वारे(माईकद्वारे) माहिती जाहीर केली. दुपारी चारच्या दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपवरील माहिती व फोटोद्वारे मुलाच्या वडिलांना मुलगा हरविल्याचे समजले. मेसेजमधील संपर्क क्रमांकानुसार अतीश शिंदे यांनी गणेश बेल्हेकर, महेश गाढवे व ठाणे अंमलदार आबा चांदगुडे यांच्याशी संपर्क साधला. अखेर चार तासांनंतर ताटातूट झालेल्या संग्रामची आईवडिलांशी भेट झाली.