शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट

By admin | Updated: February 29, 2016 00:58 IST

आमच्या अंगावर खाकी आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.

पुणे : ‘आमच्या अंगावर खाकी आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत. आम्हाला संघटित होता येत नाही,अन्यायाविरुद्ध दाद मागता येत नाही, पगारवाढीसाठी संपावर जाता येत नाही. अरे किती कराल शोषण आमचं.’ असे एक ना अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावरुन फिरत आहेत. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या पोलिसांनी म्हणून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल मीडियाद्वारे आपल्या असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’, अशी ‘इमेज’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा डीपी ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने पोलिसांमधली खदखद व्यक्त होत आहे.पोलिसांना जेवढे कमकुवत करात तेवढीच गुंडगिरी फोफावत जाईल. पोलिसांवर सर्रास उचलले जाणारे हात ही भविष्यातील धोक्यातील घंटा आहे. आज लोकांना पोलिसांवर हात उचलून छान वाटत असेल मात्र जेव्हा त्यांची मानसिक शक्ती संपेल आणि तो कमकुवत, लाचार होईल तेव्हा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे अर्धमेल्या झालेल्या पोलिसांकडून त्यावेळी मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ उरणार नाही.वाहतूक पोलिसांनी कोणाला कारवाईसाठी थांबवले तर लगेच लोक मोबाईल बाहेर काढतात. नगरसेवक, आमदार, खासदारांना फोन लावून देतात. काही शासकीय अधिकारी दमबाजी करतात. महिला पोलीस असतील तर वाहनचालक ऐकतच नाहीत. तीन वर्षांपुर्वी एका महिला वाहतूक पोलिसाला नुकत्याच आयपीएस झालेल्या एकाने रस्त्यातच मारहाण केली होती. दबाव असतानाही एका अधिकाऱ्याने मात्र या आयपीएसला गजाआड केले होते. अशा अनेक घटना दररोज घडत असतात. परंतु लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलची असलेली छबी वाईट असल्यामुळे त्यांचे दु:ख जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने दिली.गुन्हेगाराला पकडून त्याला कारवाईसाठी गेले की राजकीय पुढाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू होतात. ‘साहेब तो आपला कार्यकर्ता आहे, जरा बघा काही करता आले तर. मी वरती बोलतोच.’ असे सुनावले जाते. त्यांना न जुमानता कारवाई केली तर बदलीची भीती घातली जाते. आणि दुर्दैव म्हणजे अशा कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना प्रवेश देतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. मग पोलिसांचा दरारा कसा राहील. राजकीय झालर पांघरलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांना रोखण्याची पोलिसांना खरोखरीच मोकळीक असते का? किंबहुना ती दिली जाते का असा प्रश्न कोणी का विचारत नाही असा सवालही एका अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना उपस्थित केला.एका आमदाराने तलाठ्याला मारहाण केली तर राज्यातील सर्व तलाठी संपावर जाण्याच्या तयारीला लागले होते. संबंधित आमदारावर तातडीने कारवाई करण्यात आली. पोलीस वगळता अन्य कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मारहाण झाली असती तर संप पुकारले गेले असते. मात्र पोलिसांना संपाचा आणि संघटित होण्याचा अधिकार नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. लातुर, ठाण्यासह राज्यामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर उघडपणे निषेध नोंदवता येत नसल्यामुळे पोलिसांनी आपल्या संतप्त भावनांना सोशल मिडीयाद्वारे वाट करून दिली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर निषेधाच्या पोस्ट अपलोड केल्या आहेत. अशा वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे कुटुंबियही धास्तावले आहेत. आमिषांना बळी न पडता आपला स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे. मिंदेपणा स्वीकारला तर मार आणि अपमान सहन करावा लागेल. गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे राजकीय पक्ष, नेते यांना पोलीस स्टेशनमध्ये थारा देऊ नका. फक्त चांगल्या कामासाठी त्याचे स्वागत करा. स्वाभिमानाने जगात जगायचे असेल तर कायद्याची अंमलबजावणी करा असे सल्लेही एकमेकांना देण्यातयेत आहेत.