शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट

By admin | Updated: February 29, 2016 00:58 IST

आमच्या अंगावर खाकी आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.

पुणे : ‘आमच्या अंगावर खाकी आहे हा आमचा गुन्हा आहे का? आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत. आम्हाला संघटित होता येत नाही,अन्यायाविरुद्ध दाद मागता येत नाही, पगारवाढीसाठी संपावर जाता येत नाही. अरे किती कराल शोषण आमचं.’ असे एक ना अनेक मेसेज सध्या सोशल मीडियावरुन फिरत आहेत. वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या पोलिसांनी म्हणून त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि सोशल मीडियाद्वारे आपल्या असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’, अशी ‘इमेज’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा डीपी ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. यानिमित्ताने पोलिसांमधली खदखद व्यक्त होत आहे.पोलिसांना जेवढे कमकुवत करात तेवढीच गुंडगिरी फोफावत जाईल. पोलिसांवर सर्रास उचलले जाणारे हात ही भविष्यातील धोक्यातील घंटा आहे. आज लोकांना पोलिसांवर हात उचलून छान वाटत असेल मात्र जेव्हा त्यांची मानसिक शक्ती संपेल आणि तो कमकुवत, लाचार होईल तेव्हा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे अर्धमेल्या झालेल्या पोलिसांकडून त्यावेळी मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ उरणार नाही.वाहतूक पोलिसांनी कोणाला कारवाईसाठी थांबवले तर लगेच लोक मोबाईल बाहेर काढतात. नगरसेवक, आमदार, खासदारांना फोन लावून देतात. काही शासकीय अधिकारी दमबाजी करतात. महिला पोलीस असतील तर वाहनचालक ऐकतच नाहीत. तीन वर्षांपुर्वी एका महिला वाहतूक पोलिसाला नुकत्याच आयपीएस झालेल्या एकाने रस्त्यातच मारहाण केली होती. दबाव असतानाही एका अधिकाऱ्याने मात्र या आयपीएसला गजाआड केले होते. अशा अनेक घटना दररोज घडत असतात. परंतु लोकांच्या मनामध्ये पोलिसांबद्दलची असलेली छबी वाईट असल्यामुळे त्यांचे दु:ख जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही अशी प्रतिक्रिया एका कर्मचाऱ्याने दिली.गुन्हेगाराला पकडून त्याला कारवाईसाठी गेले की राजकीय पुढाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू होतात. ‘साहेब तो आपला कार्यकर्ता आहे, जरा बघा काही करता आले तर. मी वरती बोलतोच.’ असे सुनावले जाते. त्यांना न जुमानता कारवाई केली तर बदलीची भीती घातली जाते. आणि दुर्दैव म्हणजे अशा कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या लोकांना प्रवेश देतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. मग पोलिसांचा दरारा कसा राहील. राजकीय झालर पांघरलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांना रोखण्याची पोलिसांना खरोखरीच मोकळीक असते का? किंबहुना ती दिली जाते का असा प्रश्न कोणी का विचारत नाही असा सवालही एका अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना उपस्थित केला.एका आमदाराने तलाठ्याला मारहाण केली तर राज्यातील सर्व तलाठी संपावर जाण्याच्या तयारीला लागले होते. संबंधित आमदारावर तातडीने कारवाई करण्यात आली. पोलीस वगळता अन्य कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांसोबत मारहाण झाली असती तर संप पुकारले गेले असते. मात्र पोलिसांना संपाचा आणि संघटित होण्याचा अधिकार नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. लातुर, ठाण्यासह राज्यामध्ये पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभुमीवर उघडपणे निषेध नोंदवता येत नसल्यामुळे पोलिसांनी आपल्या संतप्त भावनांना सोशल मिडीयाद्वारे वाट करून दिली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर निषेधाच्या पोस्ट अपलोड केल्या आहेत. अशा वाढत्या घटनांमुळे पोलिसांचे कुटुंबियही धास्तावले आहेत. आमिषांना बळी न पडता आपला स्वाभिमान जागा ठेवला पाहिजे. मिंदेपणा स्वीकारला तर मार आणि अपमान सहन करावा लागेल. गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणारे राजकीय पक्ष, नेते यांना पोलीस स्टेशनमध्ये थारा देऊ नका. फक्त चांगल्या कामासाठी त्याचे स्वागत करा. स्वाभिमानाने जगात जगायचे असेल तर कायद्याची अंमलबजावणी करा असे सल्लेही एकमेकांना देण्यातयेत आहेत.