शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट !

By admin | Updated: February 29, 2016 04:32 IST

आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.

पुणे : ‘आमच्या अंगावर खाकी आहे, हा आमचा गुन्हा आहे का? ‘आमच्या हातात कायदा असला तरी सर्वाधिक लाचार आम्हीच आहोत.’ ‘आम्हाला संघटीतत होता येत नाही,अन्यायाविरुद्ध दाद मागता येत नाही, पगारवाढीसाठी संपावर जाता येत नाही.’ ‘अरे किती कराल शोषण आमचं’, अशा व्यथा मांडणारे मेसेज सध्या सोशल मीडियावरून फिरत आहेत. खादी वर्दीवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उद्विग्न झालेल्या पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि सोशल मीडियाद्वारे असंतोषाला वाट मोकळी करुन दिली आहे. ‘आम्ही सर्व पोलीस एक आहोत’ अशी ‘इमेज’ व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा डीपी ठेवून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांना जेवढे कमकुवत कराल तेवढीच गुंडगिरी फोफावेल. पोलिसांवर सर्रास उचलले जाणारे हात ही भविष्यातील धोक्यातील घंटा आहे. आज लोकांना पोलिसांवर हात उचलून छान वाटत असेल, मात्र जेव्हा त्यांची मानसिक शक्ती संपेल आणि तो कमकुवत, लाचार होईल तेव्हा महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. व्यवस्था आणि लोकांची अनास्था यामुळे अर्धमेल्या झालेल्या पोलिसांकडून त्यावेळी मदतीची अपेक्षा करण्यात अर्थ उरणार नाही, अशी भूमिका पोलीस कर्मचारी मांडत आहेत.गुन्हेगारावर कारवाई करताना पुढाऱ्यांचे, पदाधिकाऱ्यांचे फोन सुरू होतात. त्यांना न जुमानता कारवाई केली तर बदलीची भीती घातली जाते. दुर्दैव म्हणजे अशा कारवायांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनेकदा बदल्या झाल्याचीही उदाहरणे आहेत. राजकीय पक्ष गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देतात. मग पोलिसांचा दरारा कसा राहील? राजकीय झालर पांघरलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांना रोखण्याची पोलिसांना खरोखरीच मोकळीक असते का? किंबहुना ती दिली जाते का, याचा कोणी विचार करत नाही, असा सवालही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना उपस्थित केला.एका आमदाराने तलाठ्याला मारहाण केली तर राज्यातील सर्व तलाठी संपावर जाण्याच्या तयारीला लागले होते. संबंधित आमदारावर तातडीने कारवाई झाली. पोलिसांना संपाचा आणि संघटीत होण्याचा अधिकार नसल्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर उघड निषेध नोंदवता येत नसल्याची भावना काही कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली. त्याचे वडील आणि दोघेही भाऊ पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ‘बस झाली आता सहनशीलता, बस झाले आता खाकीवर हल्ले, आता पेटून उठाच..’ असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्रां’ना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. समाजाचे रक्षण करतात त्यांचे संरक्षण कोण करणार? महिलांचा आदर कोण करणार? हल्लेखोरांवर कडक कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न घेऊन महाराष्ट्रातील ‘पोलीसपुत्र’ सोमवारी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती दुबाले याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. शासनाने अशा हल्लेखोरांवर जरब बसविण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांमध्यो पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. लातूरच्या पानगावमध्ये पोलिसांना झालेली मारहाणीची घटना ताजी असताना, ठाण्यातही महिला वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण झाली. त्यात कांदिवलीमध्येही दोन पोलिसांना बेदम मारहाण झाल्याची घटना ताजी आहे. शासनाने अजूनही मौन बाळगल्याने आणखी किती असा अन्याय सहन करायचा? असा प्रश्न पोलीस कुटुंबियांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच बीडमधील राहुल दुबाले तरुणाने पुढाकार घेत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना स्थापना केली असून पोलिसांवरील प्रश्नांसाठी मंत्रालयात जाऊन प्रश्न विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.