शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

तर तुमची मोबाईल बॅटरी खराब नाही होणार

By admin | Updated: March 29, 2017 18:52 IST

हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 - हल्ली स्मार्टफोनचा वापर इतका होतो की, त्याची बॅटरीही लवकर डिस्चार्ज होते आणि मग वारंवार फोन चार्ज करावा लागतो. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला वारंवार बॅटरी चार्ज करण्याची गरज पडणार नाही. अनेकदा असे होते की, आपण फोन चार्जिंगला लावतो आणि झोपून जातो त्यानंतर सकाळी उठल्यावर फोन चार्जिंग बंद करतो. पण असं करण चुकीचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का?. आपल्यापैकी अनेकांची तक्रार असते की, स्मार्टफोनची बॅटरी लवकर खराब होते पण बॅटरी खराब होण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे का? नाही ना? चला तर मग आज आम्ही तुम्हाला नेमकं कारण आणि त्यावर उपाय सांगतो.

आपल्यापैकी अनेकजण हे दोन वर्ष फोन वापरतात आणि त्यानंतर बदलतात. सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मोबाईल पूर्णपणे चार्ज असावा यासाठी अनेकजण रात्री फोन चार्जिंगसाठी लावतात आणि सकाळी बंद करतात. पण रात्रभर चार्जिंग केल्याने फोनच्या बॅटरीवर परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या फोनची बॅटरी लवकर खराब होते तसेच फोनही हँग होण्यास सुरुवात होते. म्हणूनही हे दोन वर्षापर्यंतच फोन वापरतात आणि त्यानंतर नवा फोन घेतात.

आपण ज्या स्मार्टफोन्सचा वापर करतो त्याची बॅटरी ‘Lithium-Ions’ची बनलेली असते. गरजेपेक्षा जास्त चार्ज असल्यास बॅटरीवर परिणाम होतो. फोनचा चार्जर बनविणारी कंपनी Ankerचे प्रवक्ता Edo Campos यांनी सांगितले आहे की, स्मार्टफोन हे स्मार्ट असतात त्यामुळे त्यांना माहिती असतं की कधी आणि किती चार्ज होण्याची गरज आहे. अँड्रॉइड आणि आयफोन्समध्ये एक खास प्रकारची चिप बसविण्यात आलेली असते. ही चीप फोन चार्ज झाल्यानंतर येणा-या विद्युत प्रवाहाला थांविण्याच काम करते. म्हणजेच जर तुम्ही तुमचा फोन ओरिजनल चार्जरने चार्ज कराल तर तुमची बॅटरी लवकर खराब होणार नाही.