शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

...म्हणून शिवसेना राजना नाही देणार टाळी

By admin | Updated: January 30, 2017 12:04 IST

शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बदललेले राजकीय संदर्भ लक्षात घेऊन मनसेने शिवसेनेकडे टाळी मागितली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 30 - मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बदललेले राजकीय संदर्भ लक्षात घेऊन मनसेने शिवसेनेकडे टाळी मागितली आहे. पण शिवसेना राज ठाकरेंना टाळी देण्याची शक्यता धुसर आहे. मनसेकडून बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेले होते. शिवसेनेकडून नंतर कळवतो असे सांगण्यात आले आहे. 
 
शिवसेना मनसेबरोबर आघाडीसाठी अजिबात इच्छुक नसल्याची माहिती एबीपी माझा वृत्तवाहिनीने शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. महत्वाचे म्हणजे मनसेने अशा आघाडीसाठी कुठली अटही ठेवली नसल्याची माहिती आहे. जागा वाटपाच्या मुद्यावरुन शिवसेना भाजपाची युती तुटल्यानंतर मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना-मनसे एकत्र येण्याविषयी चर्चा सुरु झाली होती. 
 
पण शिवसेनेकडून मनसेला टाळी मिळण्याची शक्यता नसल्याची सूत्रांची माहिती आहे. पाचवर्षापूर्वीची आता मनसेची स्थिती राहिलेली नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष सोडल्यामुळे मनसेची स्थिती सध्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीत युती करुन जास्तीत जास्त नुकसान टाळण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. 
 
राज आणि उद्धव एकत्र आले तर इतिहास घडेल असे शिवसेना नेते मनोहर जोशींसह काही जणांचे मत आहे. पण सध्या तरी मातोश्रीची तशी इच्छा दिसत नाही तसेच शिवसेनेच्या नकारालाही राज ठाकरे निवडणूक प्रचारात मुद्दा बनवू शकतात.