शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही

By admin | Updated: May 8, 2017 04:08 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार २०१७’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष रवींद्र साताळकर, कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह आनंद भिडे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाणी आपण अडवितो, १५ टक्के पाणी जमिनीत मुरते तर उर्वरित ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडविता आले पाहिजे. नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांचे चेक डॅम बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी अडविता येऊ शकेल. नागपूर शहराचे सांडपाणी आम्ही विकून वर्षाला १८ कोटींचा महसूल मिळवीत आहोत. इतर शहरांनीही सांडपाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुणेकरांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरता येईल का याकडे लक्ष द्यावे असे गडकरी म्हणाले. वीज प्रकल्पांसाठी यापुढे धरणातील पाणी न वापरता सांडपाणी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. पर्यावण आणि विकास यांचा योग्य तो समतोल साधला पाहिजे. सामाजिक, आर्थिक परिवर्तन राजकारणातून झाले नाही तर ते केवळ सत्ताकारण उरते असे त्यांनी सांगितले.१११ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करणारजलमार्ग बांधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या जलमार्गाचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशातील १११ नद्यांवर जलमार्ग बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरींनी दिली.विद्वान जास्त असल्याने पुणे मागेनागपूरचा वेगाने विकास होऊ शकला; कारण नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत. पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याचे सांगत गडकरी यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.