शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
3
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
4
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
5
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
6
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
7
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
8
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
9
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
10
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
11
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
12
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
13
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
14
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
16
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
17
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
18
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
19
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
20
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान

तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही

By admin | Updated: May 8, 2017 04:08 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार २०१७’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष रवींद्र साताळकर, कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह आनंद भिडे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाणी आपण अडवितो, १५ टक्के पाणी जमिनीत मुरते तर उर्वरित ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडविता आले पाहिजे. नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांचे चेक डॅम बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी अडविता येऊ शकेल. नागपूर शहराचे सांडपाणी आम्ही विकून वर्षाला १८ कोटींचा महसूल मिळवीत आहोत. इतर शहरांनीही सांडपाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुणेकरांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरता येईल का याकडे लक्ष द्यावे असे गडकरी म्हणाले. वीज प्रकल्पांसाठी यापुढे धरणातील पाणी न वापरता सांडपाणी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. पर्यावण आणि विकास यांचा योग्य तो समतोल साधला पाहिजे. सामाजिक, आर्थिक परिवर्तन राजकारणातून झाले नाही तर ते केवळ सत्ताकारण उरते असे त्यांनी सांगितले.१११ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करणारजलमार्ग बांधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या जलमार्गाचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशातील १११ नद्यांवर जलमार्ग बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरींनी दिली.विद्वान जास्त असल्याने पुणे मागेनागपूरचा वेगाने विकास होऊ शकला; कारण नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत. पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याचे सांगत गडकरी यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.