शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही

By admin | Updated: May 8, 2017 04:08 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या मुळाशी पाणी प्रश्नच आहे. राज्यातील सिंचनाची टक्केवारी ५० टक्क्यांपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकणार नाहीत, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दिला जाणारा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार २०१७’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीला प्रदान करण्यात आला. गडकरी यांच्या हस्ते जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष रवींद्र साताळकर, कार्यवाह शैलेंद्र बोरकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे अध्यक्ष शाहू छत्रपती, नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह आनंद भिडे उपस्थित होते.गडकरी म्हणाले, देशात पडणाऱ्या एकूण पावसापैकी १५ टक्के पाणी आपण अडवितो, १५ टक्के पाणी जमिनीत मुरते तर उर्वरित ७० टक्के पाणी समुद्रात वाहून जाते. वाहून जाणारे पाणी जास्तीत जास्त अडविता आले पाहिजे. नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांचे चेक डॅम बनविण्याचे काम हाती घेण्यात आल्याने पाणी अडविता येऊ शकेल. नागपूर शहराचे सांडपाणी आम्ही विकून वर्षाला १८ कोटींचा महसूल मिळवीत आहोत. इतर शहरांनीही सांडपाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. पुणेकरांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामासाठी वापरता येईल का याकडे लक्ष द्यावे असे गडकरी म्हणाले. वीज प्रकल्पांसाठी यापुढे धरणातील पाणी न वापरता सांडपाणी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला आहे. पर्यावण आणि विकास यांचा योग्य तो समतोल साधला पाहिजे. सामाजिक, आर्थिक परिवर्तन राजकारणातून झाले नाही तर ते केवळ सत्ताकारण उरते असे त्यांनी सांगितले.१११ नद्यांचे जलमार्गात रूपांतर करणारजलमार्ग बांधण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे. ब्रम्हपुत्रा आणि गंगा या दोन नद्यांच्या जलमार्गाचे काम अग्रक्रमाने पूर्ण करण्यात येत आहे. त्याचबरोबर देशातील १११ नद्यांवर जलमार्ग बांधण्याचे नियोजन असल्याची माहिती गडकरींनी दिली.विद्वान जास्त असल्याने पुणे मागेनागपूरचा वेगाने विकास होऊ शकला; कारण नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत. पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याचे सांगत गडकरी यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.