शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

...म्हणून सदाभाऊ खोत बनले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सावली!

By admin | Updated: June 12, 2017 20:46 IST

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या मध्यस्थीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतांच्या मध्यस्थीमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सदाभाऊ खोत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीपासूनच घरोब्याचे संबंध असल्याचे आता समोर आले आहे. त्यानंतर सदाभाऊ खोतांच्या मातोश्रींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत तोंडभरून कौतुक केलं आहे. 

जेव्हा मालक (पती) कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने त्रस्त होते, त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी आम्हाला लाखो रुपये खर्च अपेक्षित होता. मायानगरी मुंबईमध्ये या संकटाच्या वेळी आमच्यासोबत भक्कमपणे उभे राहिले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!"  "जेव्हा आम्ही ह्या परिस्थितीशी  सामना करत होतो त्यावेळी सदा न मंत्री होता न आमदार!, तरीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदत केली, असं सदाभाऊंच्या मातोश्री सांगत होत्या.पुढे सदाभाऊंच्या आई म्हणाल्या, "आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या संपामुळे अडचणीत असताना सदा त्यांना एकटं सोडणार नाहीच, पण वेळप्रसंगी सदाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राजीनामा जरी दिला तरी मला त्याची चिंता नाही!" फ्री प्रेस जर्नलशी बोलताना सदाभाऊ खोत भक्कमपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सावली म्हणून का वावरतात? याचे सकारण विश्लेषण त्यांच्या आई रत्नाबाई रामचंद्र खोत यांनी आवर्जून केलं आहे. त्यावेळी मंत्री सदाभाऊ खोतसुद्धा उपस्थित होते.ज्या प्रकारे सोशल मीडियामध्ये माझ्यावर जहरी टीका केली जाते, त्यामुळे मी अस्वस्थ आहे. मला शेतकरी विरोधही ठरवले जात आहे. मला कुठल्याही प्रकारची हौस नाही, मी शेतात बसूनसुद्धा बैठका घेतल्या आहेत. मी शेतकऱ्यांसोबत तळागाळात बसणारा-उठणारा-जेवणारा-रमणारा कार्यकर्ता आहे; कायम शेतकऱ्यांसाठी झगडणारा चेहरा अशीच माझी प्रतिमा आहे. यामुळे राजू शेट्टीना माझे नेतृत्व खालसा होते की काय या भावनेमुळे असुरक्षित वाटत असावे, असंही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. जेव्हा श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट कराड हॉस्पिटलमध्ये माझे वडील रामचंद्र खोत कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा सामना करत होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट मला व्यक्तिगत पातळीवर मदत केली, असं सांगत खोतांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. उपचारादरम्यान जेव्हा माझ्या पतीची स्थिती चिंताजनक झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाला विचारले की, तुम्ही त्यांना लीलावती हॉस्पिटल मुंबईला का हलवत नाही? त्यावेळी सदाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लीलावतीचा खर्च झेपणार नाही, असे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हेलिकॉप्टरची व्यवस्था करून माझ्या पतीस लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले आणि संपूर्ण वैद्यकीय खर्चाचीसुद्धा व्यवस्था केली होती, असे खोतांच्या आईंनी आवर्जून सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीच्या आठवणीने खोत भावनिक झाले. त्यांना अश्रूही अनावर झाले होते. शेतकरी संप सुरू झाल्यापासून मंत्री सदाभाऊ खोत यांचा संपूर्ण परिवार आई, पत्नी सुमन आणि मुलगा सागर आणि सुनील शासकीय निवासस्थानी थांबलेले आहेत; ज्यावर संप काळात खासदार राजू शेट्टी टीका करत आहेत. त्यावेळीही संयमाने खोतांनी शेट्टींना उत्तर दिले. सदाभाऊ खोत यांच्या आई रत्नाबाई म्हणाल्या की, "आमच्या कुटुंबासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही; ही वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवण्याची आहे!". अनाहूतपणे वाचलेल्या या बातमीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचा जनतेमधील आदर शतपटीने वाढला आहे!

( इंग्रजी नियतकालिक फ्री प्रेस जर्नल मुंबई ११ जून २०१७ च्या बातमीचा मराठी भावानुवाद)