शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत सरकार झोपले होते का?

By admin | Updated: May 3, 2017 04:18 IST

तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का

मुंबई : तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का? तूरखरेदीत गैरप्रकार झाला असेल, तर सरकारने दोषींना फासावर चढवावे, पण त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या घोटाळ्यात सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यावरून फडणवीस सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विखे यांनी केला. शिवसेनेला विशेष अधिवेशन हवे असेल, तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी लावून धरावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन देण्यात काय अर्थ आहे? कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता, परंतु सेनेची मंडळी पूर्ण वेळ सभागृहातच होती. कर्जमाफी करायची असती, तर ती त्यांनी गेल्या अधिवेशनातच करून घेतली असती. विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारी शिवसेना तेव्हा झोपली होती का, असा सवालही विखे पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)‘तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका’शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनाऐवजी शिवसेना मंत्र्यांनी स्वत:चे राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायला हवे होते. शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर राजीनामा देण्याची भाषा शिवसेनेने यापूर्वीच केली होती, याची आठवणही विखे-पाटील यांनी करून दिली.