शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

आतापर्यंत सरकार झोपले होते का?

By admin | Updated: May 3, 2017 04:18 IST

तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का

मुंबई : तूरखरेदीत ४०० कोटींचा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार मुख्यमंत्र्यांना झाला आहे. तसे असेल तर आतापर्यंत सरकार झोपले होते का? तूरखरेदीत गैरप्रकार झाला असेल, तर सरकारने दोषींना फासावर चढवावे, पण त्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेठीस का धरता, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या घोटाळ्यात सरकारी अधिकारी गुंतले असण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यावरून फडणवीस सरकारचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली. शेतकरी कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी शिवसेना मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना स्टंटबाजी करत असल्याचा आरोप विखे यांनी केला. शिवसेनेला विशेष अधिवेशन हवे असेल, तर त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागणी लावून धरावी. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन निवेदन देण्यात काय अर्थ आहे? कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता, परंतु सेनेची मंडळी पूर्ण वेळ सभागृहातच होती. कर्जमाफी करायची असती, तर ती त्यांनी गेल्या अधिवेशनातच करून घेतली असती. विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करणारी शिवसेना तेव्हा झोपली होती का, असा सवालही विखे पाटील यांनी केला. (प्रतिनिधी)‘तूरखरेदीवरून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका’शेतकरी कर्जमाफीच्या निवेदनाऐवजी शिवसेना मंत्र्यांनी स्वत:चे राजीनामे घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जायला हवे होते. शेतकरी कर्जमाफी झाली नाही, तर राजीनामा देण्याची भाषा शिवसेनेने यापूर्वीच केली होती, याची आठवणही विखे-पाटील यांनी करून दिली.