शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट..

By admin | Updated: May 4, 2017 22:29 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिकेला नापास झालील आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयमार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - केंद्र सरकारच्या स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबई महापालिकेला नापास झालील आहे. केंद्रीय शहर विकास मंत्रालयमार्फत नुकत्याच झालेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मुंबई २९ व्या क्रमांकावर फेकली गेली आहे. विशेष म्हणजे पहिल्या दहा स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई शहराने मुंबईला मागे टाकत आठवा क्रमांक पटकावला आहे. तर स्वच्छतेच्या मोहिमेत अशी पीछेहाट झाल्याने मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचा दावा करणारी महापालिका प्रशासन तोंडघशी पडली आहे. 

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत महापालिकेने स्वच्छेसाठी अनेक उपक्रम सुरु केले. स्वच्छतेच्या अजेंडयावर मुंबई हागणदारीमुक्त करण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले. या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय शहर विकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियानेही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईचा दौरा केला. त्यावेळीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने स्वच्छतेचे दर्शन या पथकाला घडवले. ही स्वच्छता कायम ठेवण्यासाठी विभागात नियमित फेरफटका मारून स्वच्छतेची खातरजमा करण्याची ताकीदही प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना दिली होती. तसेच स्वच्छतेचा दूत म्हणून प्रसिद्ध अभिनेता सलमान खानलाही या मोहिमेत उतरवण्यात आले. 
 
काही दिवसातच मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे महापालिका प्रशासन घाईघाईने जाहीर करून मोकळे झाले. मात्र लोकसंख्याच्या तुलनेत शौचालयांचा अभाव असल्याने आजही मुंबईत काही भागांमध्ये उघड्यावरच प्रातःर्विधी उरकणारे दिसून येत आहेत. त्याचबरोबर ओला व सुका कचरा मोहिमेकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ, कचरा पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची मंदगती, देवनार कचराभूमीवर सतत लागणाऱ्या आगी आणि नालेसफाई मोहिमेचे तीनतेरा यामुळे स्वच्छतेत महापालिकेची पीछेहाट झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी दहाव्या क्रमांकावर असलेले मुंबई शहर २९ व्या क्रमांकावर पोहचले आहे. त्याचवेळी मुंबईच्या तुलनेत छाेटेसे शहर असलेले नवी मुंबई गतवर्षीच्या 12 व्या क्रमांकावरून थेट आठव्या क्रमांकावर पाेहाेचले आहे. प्रतिनिधी 
म्हणून स्वच्छतेच्या परीक्षेत मुंबईची पीछेहाट.. 
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महापालिकेने मुंबई शहराचा जागतिक दर्जा टिकवण्यासाठी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे. यासाठी स्वच्छतेच्या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात मोठ्याप्रमाणात तरतूदही वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रयोग फेल जात असल्याने मुंबईची कचराकुंडी झाली आहे. या मोहिमांमध्ये नागरी सहभाग मिळ्वण्यातही पालिकेच्या पदरात अपयशच पडले आहे. परिणामी केंद्राच्या परीक्षेत मुंबई महापालिकेची पीछेहाट झाल्याचे चित्र आहे. 
 
स्वच्छता माेहिमेचे अपयश...
*कचरा टाकण्यासाठी जागा नाही.... मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो. मात्र बेस्ट आऊट ऑफ वेस्टचे महापालिकेचे प्रयत्न फेल गेल्याने कचराभूमींवर आज कचऱ्याचे डोंगर आहेत. कचराभूमीवरील हा भार कमी करण्यातही महापालिका अपयशी ठरली आहे. सद्यस्थितीत देवनार व मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची वेळ आली आहे. त्यात देवनार कचराभूमीवरील सततच्या आगीने स्थानिकांचे आराेग्य बिघडले आहे. तळाेजा येथील जागा कचराभूमीसाठी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू हाेणे हीच यातील जमेची बाजू आहे.
 
* कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प...कचरा टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने काळाची गरज म्हणून कचरा पुर्नप्रक्रिया प्रकल्प पालिकेने हाती घेतला. त्यानुसार देवनारमध्ये चार हजार आणि कांजूर मार्गमध्ये दाेन हजार मेट्रिक टन कच-यावर प्रक्रिया हाेणार हाेती. मात्र या प्रकल्पाने आघाडी घेतलेली नाही. विभागस्तरावर कचरा प्रक्रिया केंद्र सुरू करण्याचा प्रकल्पही थंडावलाच. त्यामुळे कच-याचा ढिग व मुंबईवर कच-याचा भार वाढतच गेला.
 
* आेला व सुका कचरा वर्गीकरण माेहीम ...आेला व सुका कचरा एकत्रच कचराभूमीवर वर्षाेंवर्षे जात आहे. त्यामुळे सुका कचरा, इलेक्ट्राँनिक कचरा वेगळा करून त्यावर पुर्नप्रक्रिया करण्यासाठी आेला व सुका कचरा वर्गीकरण माेहीम 2006 मध्ये आली. ही माेहीम यशस्वी करण्यासाठी प्राेत्साहनपर याेजना, लाेक प्रबाेधन, दंडात्मक कारवाई असे सर्व प्रयाेग झाले. मात्र आेला व सुका कच-यासाठी कच-याचे स्वतंत्र डबे, नाक्यानाक्यावर कच-याचे डबे बसविण्यात पालिकेला अपयश आले.
 
* हागणदारीमुक्त मुंबई... जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात आजही अनेक ठिकाणी झाेपडपट्टीतील रहिवाशांना शाैचालयाअभावी उघड्यावरच जावे लागते. हे चित्र बदलण्याचा विडा महापालिकेने उचलला. अभिनेता सलमान खान या माेहिमेचा दूत बनला. मात्र त्याचे वडील व प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी बांद्रा येथील त्यांच्या घरासमाेरील शाैचालयास विराेध केला आहे. हागणदारीमुक्त मुंबई ही माेहीम यशस्वी झाल्याचे महापालिकेने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याला लगबगीने कळविलेही. याची शहनिशा करण्यासाठी आलेल्या केंद्रिय पथकाला स्वच्छच ठिकाण दाखविण्याची अधिका-यांची धडपड सुरू हाेती. मात्र राज्य सरकारने या माेहिमेचे खरे रूप केंद्रासमाेर मांडल्याचे समजते.
 
* सार्वजनिक शाैचालयांचा अभाव 
स्वच्छ भारत अभियानच्या नियमानुसार प्रत्येक 30 जणांमागे एक शाैचकुपी असावी. 
 
*मुंबईत झोपडपट्टीमध्ये राहणा-या 63टक्के लाेकांसाठी एक लाख 63हजार शाैचकुपी असणे अपेक्षित आहे. 
 
*मात्र मुंबईत 60 हजार शाैचकुपी कमी आहेत.