शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

फुटलेल्या मतांवरून शिवसेना-भाजपामध्ये धुसफूस

By admin | Updated: June 9, 2016 03:51 IST

शिवसेनेने गृहीत धरलेल्या कोट्यातील विधान परिषदेची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरून युतीत धुसफूस सुरू झाली आहे.

ठाणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत एकीकडे शिवसेनेने मताधिक्य अधिक घेतल्याचा दावा केला असला आणि त्यांच्या जादा मतांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर दोषारोप सुरू केले असले तरी दुसरीकडे शिवसेनेने गृहीत धरलेल्या कोट्यातील विधान परिषदेची मते फुटल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरून युतीत धुसफूस सुरू झाली आहे. भाजपाच्या नेत्यांनी मतांच्या फाटाफुटीबाबत मौन बाळगले असून आमची मते फुटलेली नाही, असे सांगत सर्व दोष शिवसेनेवर ढकलला आहे. निवडणुकीत शिवसेनेने जादा मते खेचल्याचे सांगत विजयाबद्दल जल्लोष केला. मात्र राष्ट्रवादीला कमी मते पडलेली असतांनाही वसंत डावखरे यांनी शिवसेनेची सुमारे १०० मते फोडल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे नेते खाजगीत ४० च्या घरात मते फुटल्याचे मान्यही करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटातील उरलेली ६० ते ६५ मते कोणाची हा संभ्रम कायम आहे. शिवसेनेचे नेते थेट काही न बोलता त्याचे खापर भाजपा नेत्यांवर फोडत आहेत. तर भाजपा नेत्यांनी युतीधर्म पाळल्याचे सांगत मतांच्या फाटाफुटीबाबत कानावर हात ठेवले आहे. यंदा सर्वच मतांची एकत्रित मोजणी झाल्याने फुटलेल्या मतांचा शोध घेणे दोन्ही पक्षांना अवघड बनले आहे. त्यामुळे फुटलेल्या मतांचा माग काढूनही कोणाची मते फुटली हे मात्र गुलदस्त्यातच आहे आणि हाती पुरावे नसल्याने खापर फोडणेही कठीण बनले आहे. डावखरेंना काँग्रेस- राष्ट्रवादीच्या ठाणे-नवी मुंबईतील काही स्वहीत जपणाऱ्या गटांनी दगा दिल्याचे बोलले जाते. तुलनेत वसईच्या हितेंद्र ठाकूर यांनी डावखरे यांची भक्कम पाठराखण केली. मतमोजणी केंद्रात उमेदवार रवींद्र फाटक आणि वसंत डावखरे एकत्रच बसले होते. १०५७ मतांपैकी ६ मते बाद ठरून १०५१ मतांची मोजणी सुरु झाली. पहिल्या फेरीत फाटक यांना ३११ मते, तर डावखरे यांना १८९ मते मिळाल्याने १२२ मतांची आघाडी तेथेच मिळाली. मात्र त्याचा तपशील उघड झाला नाही.निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये गेलेले राष्ट्रवादीतील नेते डावखरे यांना मदत करतील, अशी अटकळ होती. मात्र त्यांनी कसोशीने पक्षनिष्ठा पाळल्या. बाहेरून येणाऱ्यांना पदे मिळाल्याने नाराज निष्ठावंतांनी पक्षाला इशारा दिल्याचे मानले जाते. त्यातही शिवसेनेने वेळोवेळी नाक दाबल्याने काही नेत्यांनी गुपचूप तोंड उघडल्याची चर्चा आहे. पण भाजपाच्या नेत्यांनी याबाबत पूर्णत: मौन बाळगले आहे. शिवसेनेला हवा तो इशारा पोचल्याची खात्री मात्र त्यांनीकरून घेतली आहे. (प्रतिनिधी)>काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात... घोडेबाजाराची कबुली?ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या स्थापनेपासून त्यावर वर्चस्व ठेवलेल्या वसंत डावखरे यांचा शिवसेना-भारतीय जनता पक्ष महायुतीच्या रवींद्र फाटक यांनी तब्बल १५१ मतांनी पराभव केला. पक्षीय बलानुसार शिवसेनेकडे ३११, भारतीय जनता पक्षाकडे १८० आणि रिपब्लिकन पक्षाकडे आठ असे ४९९ सदस्य युतीकडे होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडील १२५ सदस्य धरून आघाडीचे बळ ४२७ च्या घरात होते. उर्वरित ६२ मते इतर छोटे पक्षांची आणि ४८ मते अपक्षांची होती. शिवसेनेच्या फाटक यांनी अपेक्षेपेक्षा १०१ मते अधिक मिळवल्याने विरोधकांची मते फुटल्याचे उघड झाले. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना छेडले असता त्यांनी यावेळी फाटकांचे डाव खरे ठरले, असे सांगत हे गुप्त मतदान असल्याने काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, असे सूचक उद्गार काढत घोडेबाजार झाल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली होती.