शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...अन् त्यांच्या आयुष्यातील धूर विरला !

By admin | Updated: March 26, 2017 17:28 IST

जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.

हरी मोकाशे/ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 26 - ज्या कुटुंबात अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्याची मारामार आहे, अशा दारिद्र्यरेषेखालील, आर्थिकदृष्ट्या मागास असलेले कुटुंब निर्धूर कसे असणार? स्वयंपाक करायचा म्हटले की, चुलीला लाकडाची गरज आलीच. चटकन् चूल पेटविण्यासाठी डोळे चोळत तोंडाने फुंकर घालण्याची झालेली नित्याची सवय. आता या सवयीला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेने बगल दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मागासलेली ४२ हजार ५५१ कुटुंबे अनुदान आणि विनातारण कर्जावर निर्धूर झाली आहे.आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाईल आला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची माहिती क्षणार्धात खेड्यातील व्यक्तींनाही मिळू लागली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तीही मोबाईल हाताळत असल्याचे दिसत आहे. पण त्यांच्या कुटुंबात एखादा पै पाहुणा आला की, त्याला चहा, नाश्ता अथवा भोजन बनविण्यासाठी चूल पेटवावी लागते. त्यासाठी गृहिणींची सुरू असलेली खटपट आणि डोळ्यांना होणारा त्रास आलाच. ग्रामीण भागातही वृक्ष संवर्धन व्हावे आणि प्रत्येक कुटुंब निर्धूर व्हावे, यासाठी गेल्या अकरा महिन्यांपासून देशात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे.या योजनेसाठी सन २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबांची निवड करण्यात आली. लातूर जिल्ह्यात अशी ६८ हजार २४३ कुटुंबे आढळली. या कुटुंबांकडून योजनेसाठी प्रस्ताव घेण्यात आले. त्यात ५४ हजार ४३७ प्रस्ताव पात्र ठरले. त्यातील ४४ हजार ४८२ कुटुंबांच्या प्रस्तावांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आणि त्यातील ४२ हजार ५५१ कुटुंबांना अनुदान आणि विनातारण कर्जावर गॅस देण्यात आले आहेत. कुटुंबास १६०० रुपयांचे अनुदान... या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी सिलिंडर व रेग्युलेटरची अनामत रक्कम, बसविण्याची आणि नोंदणीची रक्कम घेतली जात नाही. त्यामुळे योजनेअंतर्गतच्या प्रत्येक कुटुंबास जवळपास १६०० रुपयांचे अनुदान मिळते. ही रक्कम केंद्र सरकार स्वत: भरत आहे. कर्जाची परतफेड सुलभ... या योजनेअंतर्गत गॅस घेण्यासाठी रिफिल, शेगडी व शंभर रुपयांचा मुद्रांक आवश्यक आहे. या सर्वांची साधारणत: किंमत १७०० रुपये आहे. ही रक्कम लाभार्थी तात्काळ भरू शकतो अथवा त्यासाठी कर्ज घेऊ शकतो. या कर्जाची परतफेडही सिलिंडरच्या अनुदानातून वजा केली जाते. राज्यात लातूर आघाडीवर... प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेत राज्यात लातूर जिल्हा प्रथम स्थानावर आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ४२ हजार ५५१ कुटुंबांंना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दुसऱ्या स्थानावर बीड जिल्हा असून, ३७ हजार कनेक्शन देण्यात आले आहेत. तर तिसऱ्या स्थानावर नांदेड असून, ३६ हजार कनेक्शन्स देण्यात आले आहेत. ३३ हजार ४४० जणांना कर्ज... जिल्ह्यातील ४२ हजार ५५१ पैकी ३३ हजार ४४० जणांनी कर्जाद्वारे हा गॅस घेतला आहे. कर्जाच्या परतफेडीची सुविधा सुलभ असल्याने कुठलीही अडचण येत नसल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक आनंद घोडके यांनी दिली. समन्वयामुळे राज्यात आघाडी़लातूर जिल्ह्यातील ५० हजार मागासलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दीष्ट होते़ प्रशासकीय अधिकारी व लाभार्थ्यांच्या समन्वयामुळे अवघ्या सहा महिन्यात ४२ हजार ५५१ कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे़ राज्यात आपले काम सर्वात चांगले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा पुरवठा अधिकारी शोभा जाधव यांनी दिली़