शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

स्मिता सावंत यांचा मुद्दा अखेर सुप्रीम कोर्टात मान्य

By admin | Updated: September 6, 2015 00:41 IST

बृहन्मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून झालेल्या निवडीविरुद्ध निवडणूक याचिका करण्यासाठी कायद्याने ठरवून दिलेली १० दिवसांची मुदत निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी

मुंबई: बृहन्मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून झालेल्या निवडीविरुद्ध निवडणूक याचिका करण्यासाठी कायद्याने ठरवून दिलेली १० दिवसांची मुदत निवडून आलेल्या नगरसेवकांची यादी राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून नव्हे, तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निकाल जाहीर केल्यापासून सुरु होते, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.अशा प्रकारे मुंबई महापालिकेतील प्रभाग क्र. ७६ च्या नगरसेविका यांनी मांडलेला हा मुद्दा गेल्या वर्षभरात आधी लघुवाद न्यायालयात व नंतर उच्च न्यायालयात फेटाळला गेल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला आहे. परिणामी स्मिता सावंत यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी, पराभूत उमेदवार जगदीश्वरी जगदीश अमीन यांनी केलेली निवडणूक याचिका, मुदतीनंतर केली गेल्याचे ठरवून फेटाळली गेली आहे.निवडणुकीस आव्हान देणारी याचिका निकाल जाहीर झाल्यापासून १० दिवसांत करण्याची मुदत महापालिका कायद्याने ठरवून दिली आहे. बृहमुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकीचे मतदान १६ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले होते व लगेच दुसऱ्या दिवशी १७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले होते. निवडणूक निकालांची अधिसूचना २१ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली होती.जगदीश्वरी अमीन यांनी स्मिता सावंत यांच्या निवडणुकीस आव्हान देणारी याचिका २८ फेब्रुवारी रोजी दाखल केली होती.१० दिवसांची मुदत १७ फेब्रुवारीपासून मोजायला हवी. त्यामुळे अमीन यांनी एक दिवस विलंबाने याचिका केलेली असल्याने ती फेटाळली जावी, असा प्राथमिक आक्षेप सावंत यांनी घेतला होता. याविरुद्ध अमीन यांचे म्हणणे असे होते की, १० दिवसांची मुदत निकालाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून धरायला हवी. त्यानुसार आपली याचिका मुदतीच केलेली आहे. लघुवाद न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी अमीन यांचा मुद्दा मान्य करून सावंत यांचा आक्षेप फेटाळला होता. याविरुद्ध सावंत यांनी उच्च न्यायालयात केलेली याचिका न्या. एम. एस. सोनक यांनी गेल्या फेब्रुवारीत फेटाळली होती. मात्र सावंत यांनी याविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात न्या. जे. चेलमेश्वर व न्या. अभय मनोहर सप्रे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी मंजूर केले. अशा प्रकारे गेली तीन वर्षे कोर्टकज्जे केल्यानंतर सावंत यांना आपला मुद्दा सर्वोच्च न्यायालयास पटवून देण्यात अखेर यश आले आहे. यानिमित्त या वादग्रस्त मुद्द्यावर निर्णायक निकाल झाल्याने इतरांनाही तो मार्गदर्शक ठरणार आहे. या सुनावणीत स्मिता सावंत यांच्यासाठी अ‍ॅड. विनय नवरे यांनी तर अमीन यांच्यासाठी अ‍ॅड. सुधांशु एस. चौधरी यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी) निवडणूक आयोगास चपराकउच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाने अमीन यांचे समर्थन करून निवडणूक याचिका करण्याची १० दिवसांची मुदत राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासूनच मोजायला हवी, अशी भूमाका घेतली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने आयोगास चपराक बसली आहे.कायद्याच्या कलम २८(के) अन्वये यासंबंधी आयोगाने निश्चित नियम तयार करणे अपेक्षित आहे. परंतु आयोगाने ते न केल्याने संदिग्धता राहिली आहे, असे उच्च व सर्वोच्च या दोन्ही न्यायालयांनी म्हटले. आयोगाने हे नियम रास्त वेळेत करायला हवे होते, असे न्यायालयाने म्हटले.नियमांमधील या संदिग्धतेचा फायदा पराभूत उमेदवाराला द्यायला हवा, हे उच्च न्यायालयाचे म्हणणेही सर्वोच्च न्यायालायने अमान्य केले.