शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

हरवलेल्या बाराशे मुलांच्या चेहऱ्यावर परतली मुस्कान

By admin | Updated: July 24, 2016 19:52 IST

बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.

ब्रह्मानंद जाधव/ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 24 - बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या बालकांना शोधण्यास जिल्ह्यातील पोलिसांना यश आल्याने हरवलेल्या १ हजार २०७ बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आली.अल्पवयीन मुले हरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहखात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात गतवर्षीपासून आॅपरेश मुस्कान राबविण्यात येत आहे. १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये सुरूवातीला मुस्कानमोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर २०१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणाऱ्या मुलांची चौकशी मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात राबविण्यात आलेल्या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या १ हजार २०७ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. आॅपरेशन मुस्कानमध्ये १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील पोलिसांनी २३८ बालकांचा शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ ते ३१ जानेवारी २०१६ मध्ये ४५४ बालकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. १ ते ३१ एप्रिलमध्ये राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानच्या तिसऱ्या टप्प्यात १११ बालकांचा शोध लागला. तर १ ते ३० जून २०१६ या चौथ्या टप्प्यामध्ये ४०४ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिस यंत्रणेने आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्ते, धार्मिक स्थळे, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी राहणारी मुले व रस्त्यावर भीक मागणारी मुले यांची पडताळणी करून एखादे मुल जर बेपत्ता होऊन त्या ठिकाणी वास्तव करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या मुलांचे आई-वडील, कायदेशीर पालक यांचा शोध घेऊन ती मुले त्यांच्या ताब्यात देली.आॅपरेशन मुस्कानमध्ये यांनी घेतला सहभागजिल्हा पोलीस अधीक्षक संजीव कुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, एल.सी.बी. पीआय प्रतापसिंग शिखारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद यंडोले, डीसीपीओ शहानवाज खान, पीएसआय कल्पना गवई, एएसआय अंभोरे, गजानन चतुर, जाधव यांनी सहभाग घेतल्यामुळे हरवलेल्या हजारो बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आणण्यास पोलिस यंत्रणेला यश आले.जूनमध्ये ४०४ बालकांचा शोध आॅपरेशन मुस्कानमुळे १ ते ३० जून २०१६ मध्ये ४०४ बालकांचा शोध लागला आहे.त्यामध्ये पोलिस विभागाच्या पथकाने ४६ व एल.सी.बी.च्या पथकाने ३५८ बालकांचा शोध लावला आहे. यात २११ मुले व १९३ मुलींचा समावेश आहे. शोध लागलेले ४०४ बालके आई-वडिल किंवा कायदेशीर पालकत्व असलेल्यांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आली आहेत.असा लागला बालकांचा शोधआॅगस्ट 238जानेवारी 454एप्रिल 111जून 404