शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
4
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
5
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
6
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
7
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
8
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
9
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
10
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
11
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
12
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
13
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
14
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
15
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
16
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
17
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
18
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
19
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
20
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल

हरवलेल्या बाराशे मुलांच्या चेहऱ्यावर परतली मुस्कान

By admin | Updated: July 24, 2016 19:52 IST

बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले.

ब्रह्मानंद जाधव/ऑनलाइन लोकमत

बुलडाणा, दि. 24 - बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आले. या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या बालकांना शोधण्यास जिल्ह्यातील पोलिसांना यश आल्याने हरवलेल्या १ हजार २०७ बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आली.अल्पवयीन मुले हरवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हरवलेल्या मुलांना सुखरूप शोधणे व आई-वडिलांच्या ताब्यात देणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे बेपत्ता मुलांना शोधणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी गृहखात्याच्या आदेशानुसार जिल्ह्यात गतवर्षीपासून आॅपरेश मुस्कान राबविण्यात येत आहे. १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये सुरूवातीला मुस्कानमोहिम हाती घेण्यात आली. त्यानंतर २०१६ या वर्षामध्ये जानेवारी, एप्रिल व जून महिन्यात पुन्हा आॅपरेशन मुस्कान राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान विविध संस्था, सार्वजनिक ठिकाणे, हॉटेल, दुकाने, धार्मिक स्थळे, आश्रम, रेल्वेस्थानक, बसस्थानक आदी ठिकाणची व भीक मागणाऱ्या मुलांची चौकशी मोहीम हाती घेण्यात आली. जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ ते ३० जून २०१६ या कालावधीमध्ये पोलिस विभागाकडून चार टप्प्यात राबविण्यात आलेल्या आॅपरेशन मुस्कानमुळे हरवलेल्या १ हजार २०७ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. आॅपरेशन मुस्कानमध्ये १ ते ३० आॅगस्ट २०१५ मध्ये पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातील पोलिसांनी २३८ बालकांचा शोध घेतला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १ ते ३१ जानेवारी २०१६ मध्ये ४५४ बालकांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. १ ते ३१ एप्रिलमध्ये राबविलेल्या आॅपरेशन मुस्कानच्या तिसऱ्या टप्प्यात १११ बालकांचा शोध लागला. तर १ ते ३० जून २०१६ या चौथ्या टप्प्यामध्ये ४०४ बालकांना शोधण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलिस यंत्रणेने आश्रमगृह, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्ते, धार्मिक स्थळे, हॉटेल, दुकाने आदी ठिकाणी राहणारी मुले व रस्त्यावर भीक मागणारी मुले यांची पडताळणी करून एखादे मुल जर बेपत्ता होऊन त्या ठिकाणी वास्तव करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या मुलांचे आई-वडील, कायदेशीर पालक यांचा शोध घेऊन ती मुले त्यांच्या ताब्यात देली.आॅपरेशन मुस्कानमध्ये यांनी घेतला सहभागजिल्हा पोलीस अधीक्षक संजीव कुमार बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, एल.सी.बी. पीआय प्रतापसिंग शिखारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद यंडोले, डीसीपीओ शहानवाज खान, पीएसआय कल्पना गवई, एएसआय अंभोरे, गजानन चतुर, जाधव यांनी सहभाग घेतल्यामुळे हरवलेल्या हजारो बालकांच्या चेहऱ्यावर मुस्कान परत आणण्यास पोलिस यंत्रणेला यश आले.जूनमध्ये ४०४ बालकांचा शोध आॅपरेशन मुस्कानमुळे १ ते ३० जून २०१६ मध्ये ४०४ बालकांचा शोध लागला आहे.त्यामध्ये पोलिस विभागाच्या पथकाने ४६ व एल.सी.बी.च्या पथकाने ३५८ बालकांचा शोध लावला आहे. यात २११ मुले व १९३ मुलींचा समावेश आहे. शोध लागलेले ४०४ बालके आई-वडिल किंवा कायदेशीर पालकत्व असलेल्यांच्या सुखरूप ताब्यात देण्यात आली आहेत.असा लागला बालकांचा शोधआॅगस्ट 238जानेवारी 454एप्रिल 111जून 404