शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

अमावास्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’

By admin | Updated: February 27, 2017 00:48 IST

पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते

प्रशांत ननवरे,

बारामती, दि. 27- पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी विविध सहलींचे आयोजन केले जाते. बारामतीत शनिवारी मध्यरात्री अंनिसतर्फे एका आगळ्यावेगळ्या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शनि अमावस्येच्या मुहूर्तावर ‘स्मशान सहल’ काढण्यात आली. भूतबाधा, पिशाच्च आदी अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयोजित ही सहल चर्चेचा विषय ठरली. भूताचा आवडता दिवस म्हणजे अमावास्या, भूताची आवडती वेळ रात्री १२ तसेच आवडते ठिकाण स्मशानभूमी आहे, असा सर्वत्र समज आहे. लहानपणापासूनच हा समज नकळतपणे आपल्या मनावर बिंबविला आहे. या पार्श्वभूमीवर हा समज दूर करण्यासाठी या आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. काल शनि अमावास्येचा योग साधून महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समिती बारामती शाखेच्या वतीने रात्री १२ वाजता स्मशान सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा उद्देश हा भूत, भूतबाधा यांसारख्या भ्रामक कल्पनांतून तयार होणाऱ्या भीतीवर अथवा न्यूनगंडावरती मात करणे हा आहे. यामध्ये लहान मुले, युवक, युवती व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.यावेळी श्रमदानातून स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करून त्याठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेल्या वस्तूंची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. अंत्ययात्रेसाठी वापरलेली तिरडी, मोडलेले सूप, उतारा, लिंबू या सहित्यांपासून सर्वजण दूर राहणेच पसंत करतात. या सहित्याविषयी आजही मोठी भीती मनात बाळगली जाते. त्यामुळे आसपास अस्ताव्यस्त पडलेले हेच सहित्य उचलून स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीमध्येच गाणी, गप्पा गोष्टींसह कालची रात्र चांगलीच रंगल्याचे चित्र होते. यावेळी अंनिसचे कार्याध्यक्ष विपुल पाटील म्हणाले, भूत, पिशाच्य, करणी, भानामती याबाबत लहानपणापासून नकळत भीती दाखविणारेच संस्कार केले जातात. त्यातून स्मशानभूमीसह संबंधित सर्वच बाबींकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक बनतो. या पार्श्वभूमीवर निकोप वातावरणनिर्मिती होऊन मनातील गैरसमज दूर व्हावेत. लहान मुलांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. काळ्या बाहुलीची माहिती नसलेल्या मुली त्या बाहुल्यांबरोबर खेळण्यात दंग झाल्या होत्या. यावेळी भारत विठ्ठलदास यांनी ‘चमत्कारातून विज्ञान’ हे प्रयोग दाखवले. यावेळी भापकर, किरण खरात उपस्थित होते. >पुरणपोळी, आॅम्लेटचा बेतस्मशान सहलीत परिसराची स्वच्छता, गप्पागोष्टी झाल्यानंतर सर्वांनी घरून आणलेल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला. पुरणपोळी, आॅम्लेट, वडापाव, भाजी-भाकरी आदी पदार्थांचा यामध्ये समावेश होता. या वेळी खाद्यपदार्थांवर ताव मारताना सर्वजण आपण स्मशानभूमीत असल्याचे विसरून गेले होते.