शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

By admin | Updated: May 20, 2015 02:13 IST

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे.

यदु जोशी ल्ल मुंबईस्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल असून सुरुवातीला १० स्मार्ट ग्रामची उभारणी केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही कल्पना पुढे आल्यानंतर पहिले स्मार्ट ग्राम माळीण असावे, हा विचार समोर आला. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी माळीणला नुकतीच भेट दिली. शहरांवरील वाढता भार कमी करायचा असेत तर खेडी समृद्ध करणे आणि खेड्यांमध्येही उपजिविकेची साधने उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास निर्माण करण्याचा स्मार्ट ग्रामचा उद्देश असल्याचे मुंडे म्हणाल्या. योजनेची पंचसूत्री एस फॉर सॅनिटेशन (स्वच्छता), एम - मॅनेजमेंट/मॉडर्नायझेशन, (व्यवस्थापन), ए - अकाउंटॅबिलिटी (उत्तरदायित्व), आर - रिन्युएबल एनर्जी (अपारंपरिक ऊर्जा) व टी- ट्रान्स्फ रन्सी ही स्मार्ट ग्रामची पंचसूत्री असेल.बदल्यांसाठी भरला मेळासह्याद्री अतिथीगृहावर आज वेगळे चित्र होते. एकेक अधिकारी उभे राहून त्याला कुठे बदली हवी आहे ते सांगत होता आणि त्याची मागणी मान्य केली जात होती. ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत साहाय्यक गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी राज्यभरातून आपल्या बदलीचा ‘चॉइस’ सांगण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि सचिव व्ही. गिरीराज यांच्यासमोर हजर झाले. आमच्या हयातीत आम्हाला असा ‘चॉइस’ पहिल्यांदाच विचारला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी पारदर्शकपणे बदल्या करतेय, तुम्ही पारदर्शकपणे काम करावे, अशी अपेक्षा पंकजा यांनी व्यक्त केली.पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजना बंद पर्यावरण संतुलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजनेंतर्गत दरवर्षी बक्षिसे दिली जातात. ही योजना आता बंद करण्याचा शासनाचा विचार आहे. केवळ बक्षिसे देण्याइतपत ही योजना मर्यादित राहते. बक्षिसे मिळालेल्या गावांनी पुढे पर्यावरण राखले का, याचे कुठेही आॅडिटिंग होत नाही. बक्षिसांचा सोपस्कार करण्याऐवजी योजना बंद करणे योग्य ठरेल, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.