शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

‘स्मार्ट’ दलित गावांवरून सरकार ‘बॅकफूट’वर

By admin | Updated: December 16, 2015 03:11 IST

पहिल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्य शासनाची चांगलीच कोंडी केली. ‘स्मार्ट’ दलित गावांच्या

- योगेश पांडे, नागपूर

पहिल्या आठवड्यात शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राज्य शासनाची चांगलीच कोंडी केली. ‘स्मार्ट’ दलित गावांच्या योजनेची घोषणा होऊन चार महिने झाले असले तरी शासनाचे यासंदर्भात धोरण निश्चित झालेले नाही. या मुद्यावर सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिलेल्या उत्तरामुळे विरोधकांचे समाधान झाले नाही व राज्य शासनावर जोरदार हल्लाबोल केला. अखेर विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापतींना हा प्रश्न राखून ठेवावा लागला.राज्य शासनाने आॅगस्ट २०१५ मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील एका गावाचा ‘स्मार्ट’ दलित गाव म्हणून विकास करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात रामराव वडकुते, ख्वाजा बेग, अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्य शासनाकडून या योजनेची घोषणा करण्यात आली असून याअंतर्गत गावातील पाणीपुरवठा, मलनिस्सारण, अंतर्गत रस्ते, वीजपुरवठा, अद्ययावत वाचनालय, कम्युनिटी हॉल इत्यादी बाबींवर विशेष भर देण्यात येईल, असे राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केले. एक हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांची यासाठी निवड करण्यात येईल व यासाठी प्राथमिकदृष्ट्या २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु अद्याप याचे धोरण अंतिम झालेले नाही अशी माहिती त्यांनी दिली.ही योजना घोषित होऊन चार महिने झाले. परंतु तरीदेखील यासंदर्भातील धोरण तयार झालेले नाही. याचा आराखडा सरकारकडे उपलब्ध का नाही यावरून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, रामराव वडकुते यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जर सरकारकडे या योजनाचा मसुदाच तयार नाही तर २० कोटी रुपये कशासाठी ठेवले आहेत असा प्रश्न उपस्थित करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा वापर करून ही योजना तयार करण्यात आली असून अद्याप मसुदा तयार न होणे हा त्यांचा अपमान असल्याची टीका मुंडे यांनी केली. विरोधकांनी सभागृहात यावरून सरकारविरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली व काही वेळ गोंधळ निर्माण झाला. मंत्र्यांकडे याचे कुठलेही ठोस उत्तर नसल्याने ते ‘बॅकफूट’वर गेल्याचे स्पष्ट झाले. अखेर सभापती रामराजे निंबाळकर-नाईक यांनी हा प्रश्न राखून ठेवण्याचे निर्देश दिले.राज्य शासनाने ‘स्मार्ट’ दलित गावांच्या योजनेबाबत ९ आॅक्टोबर २०१५ रोजी शासन निर्णय काढला होता. परंतु याचा कुठलाही मसुदा तयार झालेला नाही. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार यात जी कामे करण्यात येणार आहेत, ती कामे अगोदरच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत घेण्यात येतात.