शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
3
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
4
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
5
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
6
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
7
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
8
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
9
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
10
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
11
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
12
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
13
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
14
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
15
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश म्हणाले- पहलगामकडे दुर्लक्ष करू शकत नाही
16
अर्जुन तेंडुलकरची होणारी पत्नी चालवते आलिशान पेट सलून, कुत्र्यांना आंघोळ घालण्यासाठी घेते एवढे पैसे 
17
रॉकेट बनले Muthoot Finance कंपनीचे शेअर्स, १० टक्क्यांपेक्षा अधिक तेजी; टार्गेट प्राईजही वाढवली
18
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
19
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
20
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?

राज्यातील उर्वरीत 8 शहरात स्मार्ट सिटीचे काम सुरु - देवेंद्र फडणवीस

By admin | Updated: June 25, 2016 17:59 IST

महाराष्ट्रातील उर्वरीत आठ शहरांमध्येही स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 25 - स्मार्ट सिटी योजनेमध्ये महाराष्ट्रातील दोन शहरे निवडण्यात आलेली असली तरी उर्वरीत आठ शहरांमध्ये स्मार्ट सिटीचे उपक्रम राबवण्यास आधीच सुरुवात केली असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपुर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ते बोलत होते. या शहरांसाठी आर्थिक मदत देण्यास जगभरातील अनेक देश उत्सुक आहेत. त्यासाठी केंद्र शासनाने मदत करावी असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले. 
 
फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत. यासोबतच समाजाच्या सर्व स्तरांना आणि विशेषत: गरीबांना स्थान मिळतेय. आजवर श्रीमंतांना सेवा मिळत आली आहे. मात्र, आता सर्वसामान्य आणि गरिबांनाही सेवा मिळणार आहे. त्यांचा विकास होईल अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शहरात इंफ्रास्ट्रकचर तयार करणारा कार्यक्रम नाही तर ट्रान्सफॉर्म करणारा कार्यक्रम, तरुणांना रोजगार मिळणार. स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमासाठी पुण्याला निवडले त्यासाठी आभारी आहे. जगातल्या स्मार्ट लोकांमध्ये पुण्यातल्या लोकांचा समावेश आहे. गेल्या 50 वर्षांपासून शहरीकरणाला शाप मानून आपण चाललो. ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणावर शहराकडे लोक आले आणि झोपडपट्ट्यांमध्ये वास्तव्य करु लागले. शहरीकरणाला आपण संधी मानत स्मार्ट सिटीसारखी नवी संकल्पना कार्यान्वित केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
नाशिक महापालिकेत पंतप्रधान मोदी यांचे लाइव भाषण ऐकन्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी महापौर यांचेसह केवळ चार नगरसेवक उपस्थित होते. मनपा कर्मचारी मात्र आदेशामुळे हजर होते.
 
 
पुण्यात स्मार्ट सिटीचे उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण : वैंकय्या नायडू
 
पुणे : पुण्यासारख्या ऐतिहासिक शहरामधून स्मार्ट सिटीचे होत असलेले उद्घाटन हा ऐतिहासिक क्षण आहे. आपण एक देश आहोत. ही टीम इंडिया आहे. एकत्र आल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही असे मत केंद्रिय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
स्मार्ट म्हणजे सुटबुट,हॅट नव्हे, तर सर्वसामान्याचे जीवन सुसह्य बनवणे आहे. शहरातील जीवनमान सुधारणे म्हणजे स्मार्ट सिटी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे सांगणा-या लोकमान्य टिळकांपासून, स्वा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. राजर्षी शाहू महाराज, संत तुकाराम, पंढरपुर सर्वांचे मुख्य केंद्र पुणे राहीले आहे. प्रत्येकाने अंतर्मुख होऊन काम करावे, प्रत्येकाने योगदान द्यावे.  ‘सब काम सरकार करेगा हम बेकार बैठेगा’ ही मानसिकता बदलून सर्वांनी स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याचे आवाह नायडू यांनी केले. नविन कल्पना, नविन मार्गदर्शन घेऊन देश पुढे जात आहे. सबका साथ सबका विकास हा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. जोपर्यंत शेवटच्या घटकाचे उत्थान होणार नाही तोपर्यंत देशाचे उत्थान होणार नाही. गरिबांसाठी घरे निर्माण करण्याचे मोठे आव्हान आहे. 
पुणेकर शांत, विचारशील, विकासाला साथ देणारे आहेत. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी म्हणजे  ‘मेकिंग आॅफ डेव्हलपेंट इंडीया’ असेही त्यांनी ठणकावून सांगत पंतप्रधानांचे कौतुक केले.