शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

सोलापूरमध्ये ‘स्मार्ट सिटी’ कळीचा मुद्दा

By admin | Updated: January 21, 2017 00:33 IST

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली.

राजकुमार सारोळे,

सोलापूर- केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेतील पहिल्या टप्प्यातील २० शहरांची २८ जानेवारी २०१६ रोजी घोषणा केली. त्यात नवव्या क्रमांकाने महाराष्ट्रात गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरचा समावेश झाला. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश होऊन वर्ष लोटले तरी एकाही कामाला सुरुवात न झाल्याने मनपा निवडणुकीत हा विषय कळीचा मुद्दा बनला आहे. केंद्र शासनाच्या पहिल्या स्मार्ट २० शहरांच्या यादीत स्पर्धेचे ६०.३० टक्के गुण मिळवून सोलापूर शहर नवव्या क्रमांकावर आले. स्मार्ट सिटी योजनेमुळे पायाभूत सुविधांसाठी खास निधी उपलब्ध होणार असल्याने गिरणगावची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार, अशी आशा निर्माण झाली. योजनेचे २८३ कोटी रुपये मनपाच्या खात्यावर आले; पण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनी, त्याचे संचालक मंडळ व त्याला सभेची मंजुरी आणि बैठकांत वेळ गेला. त्यामुळे अपेक्षित कामांना सुरुवात करता आली नाही. सध्या स्मार्ट सिटी प्रस्तावातील सर्व कामांचे प्रकल्प अहवाल तयार आहेत. टेंडरना मंजुरी नसल्याने आता निवडणुकीनंतर ही कामे सुरू होतील. पण प्राधान्याने कोणते प्रकल्प हाती घेतले, याकडे लक्ष वेधल्यास निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनणार आहे. लोकांचे आहे ते प्रश्न तसेच भिजत पडले आहेत. पाणी, रस्ते, कचरा संकलन या समस्यांवर मात करण्यात अपयश आल्याने समार्ट सिटीचे गाजर महागात पडणार आहे. >या कामाला दिले प्राधान्यकेवळ अमृत योजनेतून निधी मंजूर झालेल्या किल्लाबाग सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. हा प्रकल्प पुरातत्त्व खात्याच्या मंजुरीत अडकला आहे. रंगभवन ते भैया चौक हा रस्ता स्मार्ट करण्याचा प्रकल्प अहवाल करण्यात येत आहे. वास्तविक, पाणी आणि कचरा संकलन या प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे होते.