शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

मराठीला लागलीय गळती

By admin | Updated: August 10, 2016 01:50 IST

मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण

पुणे : मराठी भाषेचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी विविध उपक्रमांना प्राधान्य देणाऱ्या, अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून प्रयत्न करणाऱ्या आणि आगामी २५ वर्षांसाठी भाषेचे धोरण तयार करण्याच्या घोषणा देणाऱ्या राज्य शासनाचे राज्यातील ‘मराठी’कडे दुर्लक्ष होत आहे. मराठीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अपयशामुळे राज्यात दरवर्षी ७ ते १४ टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात ‘मराठी’ला गळती लागली असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. ‘मराठी’ची धुरा ज्या युवा पिढीच्या हाती सोपवायची, तीच पिढी ‘मराठी’पासून दुरावत चालल्याने महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये मराठी विभाग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे मराठीचे अध्यापन करणाऱ्या डॉ. राजेंद्र थोरात यांनी राज्यातील महाविद्यालयीन स्तरावरील मराठीच्या स्थितीबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मराठी भाषेच्या विद्यार्थी गळतीची ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत डॉ. थोरात यांनी वैयक्तिक संपर्क, सोशल मीडिया व अन्य संपर्कसाधनांचा वापर करून राज्यभरातील मराठी भाषेचे महाविद्यालयीन पातळीवरचे विद्यार्थी, त्यांची संख्या, वर्ग, शिक्षक, संशोधन, भाषाविषयक उच्च शिक्षण आदी विविध मुद्यांवर युवा पिढीशी संवाद साधला, तसेच महाविद्यालयीन पातळीवर उपलब्ध आकडेवारीची तपासणी केली, त्यातून दरवर्षी मराठी भाषेचे सुमारे ७०० ते १४०० विद्यार्थी कमी होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ओतूर, नारायणगाव येथील महाविद्यालयांमधील मराठी विभाग बंद पडले आहेत. दरवर्षी विद्यार्थीसंख्येचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटत आहे ही चिंतेची बाब आहे, या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रयत्नात मराठीच्या सद्य:स्थितीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने समोर आली आहे. े(प्रतिनिधी)