शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कामात जखडले कोमल हात!

By admin | Updated: November 14, 2014 01:16 IST

कष्टक:यांची ओळख असलेल्या मुंबापुरीतल्या बालकामगारांची संख्या हळूहळू का होईना आता कमी होऊ लागली आहे.

मुंबई : कष्टक:यांची ओळख असलेल्या मुंबापुरीतल्या बालकामगारांची संख्या हळूहळू का होईना आता कमी होऊ लागली आहे. प्रथमसारख्या सेवाभावी संस्थांसह आणि राज्य सरकारने या कामी घेतलेल्या पुढाकारामुळे बालमजुरीला काही अंशी का होईना आळा बसत असून, 1 नोव्हेंबर्पयतच्या पाहणीनुसार मुंबईत 1 हजार 375 बालकामगार असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.
उच्चभ्रू वा मध्यमवर्गीय कुटुंबातील पाल्यांसह आजी-आजोबांकडे पुरेसा वेळ असल्याने आणि घरची एकंदर परिस्थिती सुस्थितीत असल्याने त्यांच्या वाटय़ाला चांगले जगणो येते. परंतु जन्मापासून ज्यांच्या खांद्यावर कुटुंबाचे ओङो पडते अथवा लादले जाते; त्यांचे बालपण कोमेजून जाते. अशा अनेक कारणांमुळे बालमजुरीच्या खाईत लोटलेल्या बालकामगारांच्या सद्य:स्थितीवर ‘बालदिना’च्या निमित्ताने टाकलेला हा प्रकाशझोत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी.
प्रथम संस्थेने जानेवारीमध्ये केलेल्या पाहणीनुसार, मुंबईत 4 हजार 654 बालकामगार आढळून आले होते. कालांतराने ही संख्या कमी होत असली तरी अधूनमधून यात कमीअधिक फरकाने वाढ होत असते. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांतून मोठय़ा प्रमाणात बालकामगारांची तस्करी होते. बेरोजगारी, गरिबी, मुंबईचे आकर्षण या कारणांनी अनेक बालकामगार मुंबईत येतात. त्यातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त बालकामगार हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधून येतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये गॅरेजेस, हॉटेल, कचराकुंडय़ा, बांधकाम, वीटभट्टी, खाणकाम अशा ठिकाणी अल्पवयीन मुले काम करतात. अनेक मुली मोठय़ा प्रमाणात घरेलू कामगार म्हणून काम करतात. शिवाय महिला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लहान कारखान्यांतून कंत्रटी पद्धतीने घरी काम आणून करतात तेव्हा घरातली लहान मुले यात ओढली जातात. सरकारी आकडेवारीप्रमाणो देशात दीड कोटी बालमजूर आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या म्हणण्यानुसार, सहा कोटींपेक्षा अधिक बालकामगार आहेत. या आकडेवारीमध्ये मोठय़ा प्रमाणावर तफावत आढळते. कारण बालकामगार कोणाला म्हणायचे आणि बालमजुरी म्हणजे नक्की काय? याबाबतच मोठा गोंधळ आहे. दरम्यान, एका पाहणीत असे आढळले आहे की, 1993 साली 2.7 कोटी मुलांनी शाळेत प्रवेश घेतला होता. परंतु दहा वर्षांनी यातील केवळ 1 कोटी मुलेच दहावीर्पयत पोहोचली. म्हणजे तीनपैकी दोन मुलांची गळती झाली. 2क्क्9 चा जो शिक्षण हक्क कायदा आहे, त्यामुळे गळतीला आळा घालण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र शालेय व्यवस्थेतून मुलांची गळती होण्याचे हे प्रमाण चिंताजनक आहे.   पाहण्यांमध्ये सिद्ध झाले आहे शाळेत जात नाहीत ती मुले बालकामगार म्हणून काम करतात. (प्रतिनिधी)
 
18 वर्षांखालील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मूल अशी व्याख्या केली जाते. शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असेही म्हटले जाते.
 
बालकामगार बंदी व नियंत्रण कायद्यानुसार, धोकादायक उद्योगात 14 वर्षांखालील मुलाला कामावर ठेवणा:या व्यक्तींवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. जेव्हा कारवाई करण्यासाठी धाडी घातल्या जातात, तेव्हा काम करणा:या मुलांचे वय 14 वर्षांपेक्षा जास्त असल्याची पळवाट काढली जाते. शिवाय मुलांना कामावर ठेवणारे लोक कचाटय़ातून सुटून जातात.
 
गरिबी, बेकारी, अशिक्षितपणा, शहरीकरण, शाळांची कमतरता, बालहक्काच्या कायद्याची अंमलबजावणी न होणो, या कारणांमुळे बालमजुरी सुरूच राहते.