शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

वेगळ्या विदर्भासाठीच भिरकावली होती चप्पल

By admin | Updated: August 21, 2014 01:08 IST

विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते.

शोभा मस्के यांचे प्रतिपादन : विदर्भाच्या नावाखाली निवडणुकांत उतरण्याची विदर्भवाद्यांची तयारीनागपूर : विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते. सहनशीलतेला अंत असतोच. त्यांच्या विदर्भविरोधी भूमिकेसंदर्भात संताप व्यक्त करण्यासाठीच चार्मोशी येथे त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली, असे मत विदर्भवादी कार्यकर्त्या शोभा मस्के यांनी व्यक्त केले. ‘व्ही कॅन’ (विदर्भ कनेक्ट) या विदर्भवादी संस्थेतर्फे ‘मैने चप्पल क्यो मारा’ या चर्चेचे चिटणवीस केंद्र येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार्मोशी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या शोभा मस्के यांनी आपली भूमिका मांडली.या चर्चेला ज्येष्ठ विधीज्ञ व विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे , ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश समर्थ , ‘वेद’चे संस्थापक विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मस्के दाम्पत्याचा विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यातून विदर्भातील जनमताचा अपमान केल्याबद्दल जाब विचारायचा होता. अखेर सहनशीलतेचा बांध सुटला आणि त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावून विदर्भाचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचविला, असे शोभा मस्के म्हणाल्या. गेल्या १० वर्षात विदर्भासाठी लढताना २५ ते ३० गुन्हे दाखल झाले आहे. परंतु लढा चालूच राहील. जोपर्यंत विदर्भ देणार नाही तोपर्यंत विदर्भविरोधी नेत्यांना या भूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात नागपुरातील यशवंत स्टेडियमचे नाव ‘स्व.बापूजी अणे’ स्टेडियम असे करण्यासाठी आंदोलन उभारून करावी असे मत बाबूराव मस्के यांनी व्यक्त केले. शोभा मस्के यांच्यामुळे विदर्भाचे आंदोलन ४४ वर्षानंतर आक्रमक झाले आहे. यानंतर कुठलाही नेता विदर्भाच्या भूमीत येऊन विदर्भविरोधी भूमिका घेण्याअगोदर दहा वेळा विचार करेल, असे मत जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ‘व्ही कॅन’चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात अनेकांनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)विदर्भवादी निवडणूक लढणार?वेगळ््या विदर्भाच्या लढ्याला आणखी धार यावी यासाठी विदर्भवाद्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत उभे राहावे असा सूर या चर्चेत दिसून आला. निवडणूक लढायला काहीच हरकत नाही. विदर्भाचा आवाज बुलंद होत असेल तर हे पण करायला हवे असे मत ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी व्यक्त केले. ‘व्ही-कॅन’सोबतच इतर विदर्भवादी सदस्यांनी विदर्भाच्या नावाखाली जर सर्व एकत्र येत असतील तर निवडणूक लढण्याची तयारी यावेळी बोलून दाखविली.मोदींचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चापंतप्रधानांचे वेगळ्या विदर्भाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्ही कॅन’तर्फे जिल्हा न्यायालय ते संविधान चौकापर्यंत गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.