शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

वेगळ्या विदर्भासाठीच भिरकावली होती चप्पल

By admin | Updated: August 21, 2014 01:08 IST

विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते.

शोभा मस्के यांचे प्रतिपादन : विदर्भाच्या नावाखाली निवडणुकांत उतरण्याची विदर्भवाद्यांची तयारीनागपूर : विदर्भाच्या मातीत येऊन येथील जनतेच्या भावनांचा अपमान करण्याचा राजकारण्यांना काहीच हक्क नाही. अजित पवार सातत्याने विदर्भवाद्यांच्या लढ्याचा अपमान करीत होते. सहनशीलतेला अंत असतोच. त्यांच्या विदर्भविरोधी भूमिकेसंदर्भात संताप व्यक्त करण्यासाठीच चार्मोशी येथे त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली, असे मत विदर्भवादी कार्यकर्त्या शोभा मस्के यांनी व्यक्त केले. ‘व्ही कॅन’ (विदर्भ कनेक्ट) या विदर्भवादी संस्थेतर्फे ‘मैने चप्पल क्यो मारा’ या चर्चेचे चिटणवीस केंद्र येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चार्मोशी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने चप्पल भिरकावणाऱ्या शोभा मस्के यांनी आपली भूमिका मांडली.या चर्चेला ज्येष्ठ विधीज्ञ व विदर्भवादी अ‍ॅड. श्रीहरी अणे , ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अ‍ॅड.मुकेश समर्थ , ‘वेद’चे संस्थापक विलास काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मस्के दाम्पत्याचा विशेष भेट देऊन सत्कार करण्यात आला. अजित पवार यांनी त्यांच्या वक्तव्यातून विदर्भातील जनमताचा अपमान केल्याबद्दल जाब विचारायचा होता. अखेर सहनशीलतेचा बांध सुटला आणि त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावून विदर्भाचा संताप त्यांच्यापर्यंत पोहोचविला, असे शोभा मस्के म्हणाल्या. गेल्या १० वर्षात विदर्भासाठी लढताना २५ ते ३० गुन्हे दाखल झाले आहे. परंतु लढा चालूच राहील. जोपर्यंत विदर्भ देणार नाही तोपर्यंत विदर्भविरोधी नेत्यांना या भूमीत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वेगळ्या विदर्भासाठी जनतेनेच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात नागपुरातील यशवंत स्टेडियमचे नाव ‘स्व.बापूजी अणे’ स्टेडियम असे करण्यासाठी आंदोलन उभारून करावी असे मत बाबूराव मस्के यांनी व्यक्त केले. शोभा मस्के यांच्यामुळे विदर्भाचे आंदोलन ४४ वर्षानंतर आक्रमक झाले आहे. यानंतर कुठलाही नेता विदर्भाच्या भूमीत येऊन विदर्भविरोधी भूमिका घेण्याअगोदर दहा वेळा विचार करेल, असे मत जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला ‘व्ही कॅन’चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. विदर्भाच्या आंदोलनासंदर्भात अनेकांनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)विदर्भवादी निवडणूक लढणार?वेगळ््या विदर्भाच्या लढ्याला आणखी धार यावी यासाठी विदर्भवाद्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांत उभे राहावे असा सूर या चर्चेत दिसून आला. निवडणूक लढायला काहीच हरकत नाही. विदर्भाचा आवाज बुलंद होत असेल तर हे पण करायला हवे असे मत ‘व्ही कॅन’चे अध्यक्ष अ‍ॅड. मुकेश समर्थ यांनी व्यक्त केले. ‘व्ही-कॅन’सोबतच इतर विदर्भवादी सदस्यांनी विदर्भाच्या नावाखाली जर सर्व एकत्र येत असतील तर निवडणूक लढण्याची तयारी यावेळी बोलून दाखविली.मोदींचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चापंतप्रधानांचे वेगळ्या विदर्भाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘व्ही कॅन’तर्फे जिल्हा न्यायालय ते संविधान चौकापर्यंत गुरुवारी मोर्चा काढण्यात येणार आहे.