शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

निकृष्ट माल वापरल्यानेच ‘तो’ स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 05:33 IST

बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले

पुणे : बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याचे परिक्षण कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगच्या तज्ज्ञांनी केले असून त्यांनी दिलेल्या अहवालावरुन या गुन्ह्यात आवश्यक त्या कलमांचा समावेश केला असल्याचा युक्तीवाद सरकारी वकील उज्वला पवार यांनी केला़ बालेवाडी येथील स्लॅब दुर्घटना प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले आहेत़ त्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय़ पी़ लाडेकर यांच्या न्यायालयात सुरु आहे़ बुधवारी बचाव पक्षाच्या वकीलांचे युक्तीवाद झाले़ सरकारी वकील उज्वला पवार यांनी गुरुवारी आपला युक्तीवाद सुरु केला़ त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेनंतर इंजिनिअरिंग कॉलेजमधील तज्ज्ञांनी येथे येऊन बांधकामासाठी वापरलेल्या कच्च्या मालाचे परिक्षण केले़ ते निकृष्ट असल्याचा अहवाल दिला आहे़ बांधकाम व्यावसायिकांनी कंत्राटदाराशी केलेल्या करारात प्रत्येक मजल्याचे बांधकाम केल्यानंतर त्यांचा इंजिनिअर येऊन त्याची तपासणी करेल व त्यानंतर पुढील कामाला परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे़ याचा अर्थ या बांधकाम व्यावसायिकांना या ठिकाणी बांधकाम करताना दुर्घटना घडू शकते, याची कल्पना होती़ हे कामगार १४० फुटावर काम करीत होते़ त्यांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरविल्यानेच त्यांचा इतक्या उंचावरुन पडून मृत्यु झाला़ हा गुन्हा अजून तपासावर आहे़ अजून दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल केलेले नाही़ असे असताना पोलिसांनी त्यातील कलमे चुकीची लावली, असे म्हणता येणार नाही़ या गुन्ह्यात मृत्युमुखी पावलेल्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिल्याची प्रतिज्ञापत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत़ परंतु, त्यावर कोण नातेवाईक आहे, त्याचे पत्ते काय, तसेच त्यावर स्वाक्षरी नाही़ ही न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले़ अ‍ॅड़ पवार यांचा युक्तीवाद गुरुवारी अपूर्ण राहिला असून तो शुक्रवार सुरु करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)