शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

स्कायवॉकवर गुटुर्र गू!

By admin | Updated: July 21, 2016 02:32 IST

स्कायवॉकच्या सुरक्षेकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने तेथे प्रेमीयुगुलांचे चाळे वाढले आहेत.

आकाश गायकवाड,

डोंबिवली- कल्याण-डोंबिवलीत स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी आणि पादचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून कोट्यवधी रूपये खर्चून बांधलेल्या स्कायवॉकच्या सुरक्षेकडे पोलीस आणि पालिका प्रशासनाचे लक्ष नसल्याने तेथे प्रेमीयुगुलांचे चाळे वाढले आहेत. त्यातच सायंकाळनंतर पुरेशी प्रकाशव्यवस्था नसल्याने आणि कॅमेरे नसल्याने अवैध धंदा करणाऱ्यांचे फावत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. कल्याण आणि डोंबिवलीतील रेल्वेपुलाला जोडून स्कायवॉक बांधण्यात आले. त्यातून स्टेशन परिसरातील गर्दी कमी व्हावी हा हेतू होता. मात्र फेरीवाले, अवैध विक्रेते यांनीच त्यांचा ताबा घेतला. शहर पोलीस, रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल यांच्या हद्दीच्या वादात फेरीवाल्यांवर फारशी कारवाई होत नसल्याने त्यांनी तेथील मोक्याच्या जागा बळकावल्या आहेत. त्या जागेच्या मालकीवरून फेरीवाल्यांत मारामाऱ्याही हत आहोत. या स्कायवॉकसाठी पालिका, एमएमआरडीएक, रेल्वे यांनी कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत. कल्याणच्या स्कायवॉकवर आधीच शेड होती. मात्र डोंबिवलीत फेब्रिक शेड उभारण्याचे काम सुरू आहे. त्यातून प्रवाशांची सोय होण्याऐवजी फेरीवाले, प्रेमी युगुले, अवैध धंदा करणाऱ्यांना आसरा मिळाला. त्यांची सोय झाल्याचे या स्कायवॉकवर फिरताना जाणवतो. फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने त्यांच्या मालाच्या ने-आणीत लाद्या तुटल्या आहेत. कठडे मोडले आहेत. शिवाय त्यांच्या मालामुळे पुलावर, पुलाखाली, रेल्वे मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरते आहे. भटकी कुत्री, मोकाट जनावरे, गर्दुल्ले, भिकारी यांचाही तेथे मुक्त संचार असतो. दुपारी आणि रात्रीची गर्दीची वेळ टळताच स्कायवॉकवर शुकशुकाट असल्याने त्याचा फायदा घेऊन अनेक तरु ण-तरु णींचा प्रणय रंगात आल्याचे दिसून येते. ज्या भागात अजून शेड टाकलेली नाही तेथे पावसाचा फायदा गेत छत्रीच्या आडोशाने चाळे सुरू असतात. त्यामुळे स्कायवॉकवरून जाणाऱ्यांना मान खाली करून प्रवास करावा लागतो. कल्याण-डोंबिवलीतील उद्याने, खाडीकिनारे, या प्रेमीयुगलांनी आधीच हाऊसफुल्ल असताना आता त्यांनी स्कायवॉकचाही आधार घेतल्याचे दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी चाळे सुरू असूनही पोलीस मात्र त्यावर कारवाई करताना दिसत नाहीत. >वारांगनांचाही वावरपावसामुळे आणि रस्त्यावरील गर्दी कमी असल्याने वारांगना आणि अवैध धंदे करणाऱ्यांनाही मोकळे रान मिळाले आहे. त्यांच्यामुळे अन्य महिलांनाही आंबटशौकीन प्रवाशांचा त्रास होतो.त्यामुळे किमान रात्रीच्या वेळी स्कायवॉकवर सुरक्षा ठेवावी, अशी महिला प्रवाशांची मागणी आहे.