शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 28, 2017 02:10 IST

राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी केल्याने तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, सध्या आभाळच फाटलेय, पण खचून न जाता ते शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावांतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्याची मागणीही केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा आमचा निर्धार आहे. वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करू नका, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार आहोत. समस्या संपणार नाही, पण पर्याय शोधत राहू. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.शेतीसाठी सोलार फिडर-शेतीसाठी सोलार फिडर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरु वात राळेगणसिद्धीतून होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावे लागणार होते. मात्र आता कल्पक (इनोव्हेटिव्ह ) पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.