शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

आभाळच फाटलेय, पण शिवून दाखवू - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 28, 2017 02:10 IST

राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याने गेली दोन ते तीन वर्षे सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. राज्यात आधीच वित्तीय तूट आहे. आता कर्जमाफी केल्याने तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे. पण त्यातूनही मार्ग काढू, सध्या आभाळच फाटलेय, पण खचून न जाता ते शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावांतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन आभार मानले. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना वाढीव अनुदान देण्याची मागणीही केली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा आमचा निर्धार आहे. वित्त विभागाने १५ हजार कोटींच्या वर कर्जमाफी करू नका, अशा सूचना दिल्या होत्या, मात्र आम्ही त्याच्या पुढे जाऊन कर्जमाफी केली. समृद्धी महामार्गाचा उपयोग शेतकऱ्यांसाठी होणार आहे. दिलेल्या जमिनी कोल्ड चेन स्टोरेजसाठी वापरणार आहोत. समस्या संपणार नाही, पण पर्याय शोधत राहू. दरवेळेस आंदोलन करायची गरज नाही, चर्चेने नेहमी मार्ग निघू शकतो, असा टोलाही फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.शेतीसाठी सोलार फिडर-शेतीसाठी सोलार फिडर आणणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात वीज मिळेल. त्याची सुरु वात राळेगणसिद्धीतून होईल, असेही त्यांनी सांगितले. सध्या जे विकास प्रकल्प सुरू आहेत. त्यासाठी कर्ज काढावे लागणार होते. मात्र आता कल्पक (इनोव्हेटिव्ह ) पद्धतीने पैसे उभारावे लागणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.