शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रत्येक एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास मंडळ

By admin | Updated: March 25, 2017 00:27 IST

राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे

मुंबई : राज्याच्या प्रत्येक औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रात एक कौशल्य विकास मंडळ असावे यापद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. भाजपाचे अतुल भातखळकर यांनी खालापूर तालुक्यातील भूसंपादनाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर देसाई म्हणाले की, खालापूर टाकुलीतील १२ गावांमधील १ हजार १५० हेक्टर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित केलेली आहे. तेथे येण्याची तयारी अनेक उद्योगांनी दाखविली आहे. तेथे वाटाघाटी करून जमिनीचे दर निश्चित केले जातील.चर्चेत सदस्य आशिष शेलार, योगेश सागर आदींनी भाग घेतला.वीज तारा देखभालीसाठी डीपीसीने निधी द्यावा महावितरण कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यासंदर्भातील प्रक्रि या आता आॅनलाईन करण्यात येत आहे. राज्यातील वीजेच्या तारांची देखभाल दुरु स्ती करण्यासाठी ५ हजार ५०० कोटी रु पयांची आवश्यकता असून राज्य शासन व जिल्हा विकास नियोजन निधीतून ही रक्कम उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.सावरडे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे वीजेची तार गळ्यात अडकून दुचाकीस्वाराच्या झालेल्या मृत्यूबाबत सदस्य सदानंद चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बावनकुळे म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबाला महावितरणमार्फत चार लाख रु पयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या वीजेच्या तारेसंदर्भात कारवाई करण्याबाबत संबंधित लाईनमनला निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याने योग्य वेळी कार्यवाही न केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत मुख्य विद्युत निरीक्षकाच्या माध्यमातून या घटनेची अंतिम चौकशी करु न कारवाई करण्यात येईल.विनावापर २ हजार भूखंड ताब्यात-राज्यात औद्योगिकीकरणासाठी देण्यात आलेले मात्र विनावापर असलेले दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांचे पुनर्वाटपाची प्रक्रि या सुरु झाली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत दिली.सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योग उभारणीसाठी वितरीत केलेले भूखंड विनावापर पडून असल्याबाबत सदस्य सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. देसाई म्हणाले की, या दोन जिल्ह्यात २६५१ भूखंडांपैकी २४९५ भूखंडांचे औद्योगिक वापरासाठी वितरण करण्यात आले. मात्र यातील सुमारे ११० भूखंड विनावापर पडल्याचे आढळून आले. ते ताब्यात घेण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)