शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साखर मूल्यांकनात सहाव्यांदा घट

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

राज्य बँकेचा निर्णय : प्रतिक्विंटल २२७५ रुपये ऐवजी २१७० रुपये साखरेचे मूल्यांकन

प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४/१५ हे वर्ष साखर कारखान्यांसाठी आर्थिक कडवट बनत चालले आहे. या हंगामात ऊसदर भागविण्यासाठी आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेने सहाव्यांदा साखरेच्या मूल्यांकनात घट केली असल्याने सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.हंगाम २०१४/१५ ची सुरुवात नोव्हेंबर २०१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचे दर सर्वसाधारण ३००० ते ३१०० रुपये होते. यावेळी राज्य बँकेने साखर कारखान्यांना उत्पादित होणाऱ्या प्रतिक्विंटल साखर पोत्यावर २८५० रुपये उचल देण्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर हंगाम सुरू होताच साखरेच्या दरात सतत घसरण सुरू झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१४ मध्ये असणारे ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर घसरून ते जानेवारी २०१५ मध्ये २८०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून दिली जाणारी प्रतिक्विंटल उचल कमी करून २७३० रुपये केली.यानंतर फेब्रवारी २०१५ मध्ये साखरेच्या दरात पुन्हा घसरण होऊन हे दर २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने साखर मूल्यांकनात घट करून २५३० रुपये उचल जाहीर केली. मात्र, ही साखर दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. मार्चमध्ये साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटल झाले. यामुळे पुन्हा राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून २३३० रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये साखरेचे दर पुन्हा २२५० ते २२२३ रुपये प्रतिक्विंटलवर आल्यानंतर पुन्हा साखर मूल्यांकन घटवून २२७५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले.सध्या बाजारातील साखरेचे दर २२५० ते २३०० रुपयांवर स्थिर असले, तरी पुढील काळात साखरेचे दर घसरण्याची शक्यता गृहित धरून पुन्हा साखर मूल्यांकन १०० रुपये प्रतिक्विंटल कमी केले असून, सर्वच कारखान्यांना प्रतिक्विंटल २१७० रुपये साखर मूल्यांकन करण्यात आल्याचे राज्य सहकारी बँकेकडून कळविण्यात आल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. पुढील हंगामात कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी शक्यता साखर उद्योगातून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये२१७० रुपये प्रतिक्विंटल साखरेची उचल राज्य बँकेने जाहीर केली, तरी त्याच्या ८५ टक्के म्हणजे १८३६ रुपये प्रतिक्विंटल ऊसदर देण्यासाठी दिले जातात. त्यातून कारखान्याने पूर्वी उचललेल्या कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च असे ५०० रुपये अगोदरच कमी करून घेतले जातात, तर २५० रुपये इतर कपात, असे ७५० रुपये कपात करून साखर मूल्यांकनाच्या २१७० पैकी केवळ ११७५ रुपयेच ऊसदर देण्यासाठी कारखानदारांच्या हातात राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी एफआरपी २४०० ते २६७५ आहे. हे पाहता १३०० ते १५०० रुपये प्रतिटन ऊसदर देण्यासाठी कारखानदारांना कमी पडणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.व्यापाऱ्यांकडून साखर दरासाठी प्रचंड लॉबिंग साखर उत्पादन झाले असताना त्याला मागणी मात्र त्या प्रमाणात नसल्याने साखर कारखानदार हवालदिल झाले आहेत. सध्या साखरेच्या पडलेल्या दराचा फायदा उठविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून लॉबिंग होत असून, कारखान्यांच्या साखर टेंडरला प्रतिसाद मिळेना. व्यापारी दर पाडण्यासाठीच साखर खरेदी करत नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे.पॅकेजनंतरही अडचणशासनाने अलीकडेच दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले, तरी यातून साखर कारखान्यांना २०० ते २२५ रुपये प्रतिटनच द्यायला कारखान्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे आणखी १००० ते १२०० रुपये कोठून उभे करावयाचे, हा यक्ष प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.