शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

साखर मूल्यांकनात सहाव्यांदा घट

By admin | Updated: May 27, 2015 01:19 IST

राज्य बँकेचा निर्णय : प्रतिक्विंटल २२७५ रुपये ऐवजी २१७० रुपये साखरेचे मूल्यांकन

प्रकाश पाटील - कोपार्डे -हंगाम २०१४/१५ हे वर्ष साखर कारखान्यांसाठी आर्थिक कडवट बनत चालले आहे. या हंगामात ऊसदर भागविण्यासाठी आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या राज्य सहकारी बँकेने सहाव्यांदा साखरेच्या मूल्यांकनात घट केली असल्याने सद्य:स्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.हंगाम २०१४/१५ ची सुरुवात नोव्हेंबर २०१४ मध्ये झाली. यावेळी साखरेचे दर सर्वसाधारण ३००० ते ३१०० रुपये होते. यावेळी राज्य बँकेने साखर कारखान्यांना उत्पादित होणाऱ्या प्रतिक्विंटल साखर पोत्यावर २८५० रुपये उचल देण्याचे जाहीर केले होते. मात्र, यानंतर हंगाम सुरू होताच साखरेच्या दरात सतत घसरण सुरू झाली. आॅक्टोबर, नोव्हेंबर २०१४ मध्ये असणारे ३००० ते ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर घसरून ते जानेवारी २०१५ मध्ये २८०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून दिली जाणारी प्रतिक्विंटल उचल कमी करून २७३० रुपये केली.यानंतर फेब्रवारी २०१५ मध्ये साखरेच्या दरात पुन्हा घसरण होऊन हे दर २६५० ते २७०० रुपये प्रतिक्विंटलवर आले. यावेळी राज्य बँकेने साखर मूल्यांकनात घट करून २५३० रुपये उचल जाहीर केली. मात्र, ही साखर दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. मार्चमध्ये साखरेचे दर २४५० रुपये प्रतिक्विंटल झाले. यामुळे पुन्हा राज्य बँकेने बाजारातील साखरेच्या दराचा विचार करून २३३० रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये साखरेचे दर पुन्हा २२५० ते २२२३ रुपये प्रतिक्विंटलवर आल्यानंतर पुन्हा साखर मूल्यांकन घटवून २२७५ रुपये प्रतिक्विंटल करण्यात आले.सध्या बाजारातील साखरेचे दर २२५० ते २३०० रुपयांवर स्थिर असले, तरी पुढील काळात साखरेचे दर घसरण्याची शक्यता गृहित धरून पुन्हा साखर मूल्यांकन १०० रुपये प्रतिक्विंटल कमी केले असून, सर्वच कारखान्यांना प्रतिक्विंटल २१७० रुपये साखर मूल्यांकन करण्यात आल्याचे राज्य सहकारी बँकेकडून कळविण्यात आल्याने साखर उद्योगात खळबळ उडाली आहे. पुढील हंगामात कारखाने सुरूच होणार नाहीत, अशी शक्यता साखर उद्योगातून वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये२१७० रुपये प्रतिक्विंटल साखरेची उचल राज्य बँकेने जाहीर केली, तरी त्याच्या ८५ टक्के म्हणजे १८३६ रुपये प्रतिक्विंटल ऊसदर देण्यासाठी दिले जातात. त्यातून कारखान्याने पूर्वी उचललेल्या कर्जाचे व्याज, उत्पादन खर्च असे ५०० रुपये अगोदरच कमी करून घेतले जातात, तर २५० रुपये इतर कपात, असे ७५० रुपये कपात करून साखर मूल्यांकनाच्या २१७० पैकी केवळ ११७५ रुपयेच ऊसदर देण्यासाठी कारखानदारांच्या हातात राहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी एफआरपी २४०० ते २६७५ आहे. हे पाहता १३०० ते १५०० रुपये प्रतिटन ऊसदर देण्यासाठी कारखानदारांना कमी पडणार आहेत. यामुळे जिल्ह्यातील कारखाने २५० कोटी शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत.व्यापाऱ्यांकडून साखर दरासाठी प्रचंड लॉबिंग साखर उत्पादन झाले असताना त्याला मागणी मात्र त्या प्रमाणात नसल्याने साखर कारखानदार हवालदिल झाले आहेत. सध्या साखरेच्या पडलेल्या दराचा फायदा उठविण्यासाठी व्यापाऱ्यांकडून लॉबिंग होत असून, कारखान्यांच्या साखर टेंडरला प्रतिसाद मिळेना. व्यापारी दर पाडण्यासाठीच साखर खरेदी करत नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे.पॅकेजनंतरही अडचणशासनाने अलीकडेच दोन हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले असले, तरी यातून साखर कारखान्यांना २०० ते २२५ रुपये प्रतिटनच द्यायला कारखान्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे आणखी १००० ते १२०० रुपये कोठून उभे करावयाचे, हा यक्ष प्रश्न कारखानदारांपुढे उभा आहे.