शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुन्हा छमछम नाइट!

By admin | Updated: March 3, 2016 05:08 IST

महाराष्ट्रात डान्सबारच्या परवान्यांसाठी सरकारने ठरविलेल्या २४ पैकी सात अटींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेरबदल केले आणि १५ मार्चपर्यंत परवाने जारी करण्याचा आदेश दिला.

डान्सबारना १५ मार्चपर्यंत परवाने द्या : सुप्रीम कोर्टाचे आदेश; प्रवेशद्वारावरच सीसीटीव्हीनवी दिल्ली : महाराष्ट्रात डान्सबारच्या परवान्यांसाठी सरकारने ठरविलेल्या २४पैकी सात अटींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी फेरबदल केले आणि या सुधारित अटींची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना येत्या १५ मार्चपर्यंत परवाने जारी करण्याचा आदेश दिला. मात्र या आदेशानंतर लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केल्याने लगेच परवाने मिळून डान्सबार पुन्हा सुरू होतील, असे दिसत नाही.डान्सबारच्या डान्स फ्लोअरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व या कॅमेऱ्यांनी होणारे चित्रीकरण त्याच वेळी थेट (लाइव्ह फूटेज) त्या भागातील पोलीस ठाण्यात दिसेल, अशी व्यवस्था करावी, अशी एक महत्त्वाची अट होती. डान्सबारमध्ये नेमके काय सुरू आहे याची माहिती पोलिसांना वेळीच मिळावी व त्यानुसार कारवाई करता यावी, हा यामागचा उद्देश होता. मात्र, असे करणे म्हणजे डान्सबारमध्ये नृत्य करणाऱ्या मुली व तेथील ग्राहक यांच्या ‘प्रायव्हसी’चे उल्लंघन करणे ठरेल, असे म्हणून न्यायालयाने ही अट अमान्य केली. त्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने डान्सबारच्या प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे पुरेसे आहे, असे न्यायालयाने म्हटले.याआधी राज्य सरकारने डान्सबारवर २००५ मध्ये घातलेली बंदी न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केली होती. त्यानंतर राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलीस कायद्यात पुन्हा दुरुस्ती करून दुसऱ्यांदा बंदी घातली. यास इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशनने थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आधी रद्द केलेली कायदादुरुस्ती व नव्याने केलेली दुरुस्ती यात काहीच फरक नाही, असे म्हणत न्यायालयाने गेल्या वर्षी १५ आॅक्टोबर रोजी या दुसऱ्यांदा घातलेल्या बंदीला अंतरिम स्थगिती दिली. मात्र परवाने देताना राज्य सरकार, डान्सबारमध्ये काम करणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण होणार नाही यादृष्टीने सुयोग्य अटी घालू शकेल, अशी मुभा न्यायालयाने दिली होती.पोलिसांनी परवान्यासाठी एकूण २४ अटी घातल्या. यापैकी प्रामुख्याने सात अटी जाचक व अतिरेकी स्वरूपाच्या आहेत, असा हॉटेल मालकांनी आक्षेप घेतला. त्यावर सरकारने या अटींचा फेरविचार करावा, असे न्यायालयाने २५ फेब्रुुवारी रोजी सांगितले होते.न्या. दीपक मिश्रा व न्या. शिवकीर्ती सिंग यांच्या खंडपीठापुढे बुधवारी पुढील सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन सरकारने प्रस्तावित केलेल्या अटींपैकी सात अटींमध्ये थोडेफार फेरफार केले.डान्सबार परवान्यासाठी अर्ज केले आहेत त्यांनी येत्या तीन दिवसांत या सुधारित अटींची पूर्तता करावी व त्यानंतर १० दिवसांत म्हणजे १५ मार्चपर्यंत डान्सबारचे परवाने जारी केले जावेत, असे आदेश न्यायालयाने दिले.आता तरी संबंधित सक्षम प्राधिकारी परवाने न देण्यासाठी काही नव्या क्लृप्त्या करणार नाहीत व न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, अशी खात्री खंडपीठाने व्यक्त केली. याप्रमाणे डान्सबारना परवाने देण्याच्या दृष्टीने नेमकी काय प्रगती झाली, याचा दोन आठवड्यांनी फेरआढावा घेणार आहे.डान्सबारमध्ये बीभत्सपणाचे प्रदर्शन करण्यात येते, त्यामुळे अशा प्रकारास आपले सरकार कदापि परवानगी देऊ शकत नाही. पर्याय सुचविण्यासाठी राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात जाईल.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री > नव्या अटी अशाप्रत्येक डान्सबारमध्ये नृत्यासाठी १० फूट बाय १२ फूट आकाराचे फक्त एकच स्टेज असेल.हॉटेलचे रेस्टॉरन्ट व परमिट रूम अशी अपारदर्शी पार्टिशनने स्वतंत्र विभागणी केलेली असेल.नृत्याच्या स्टेजला लागून कायमस्वरूपी पक्क्या पार्टिशनऐवजी तीन फूट उंचीचे रेलिंग असेल.नृत्य करणाऱ्या मुली व ग्राहकांची आसनव्यवस्था यात किमान पाच फुटांचे अंतर असेल.एका वेळी फक्त चार मुली स्टेजवर नृत्य करू शकतील. मात्र याहून जास्त असलेल्या नर्तिका मुली हॉटेलच्या इतर भागात थांबू शकतील.गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीला डान्सबारमध्ये नोकरी नाही.धाड पडल्यास लपून बसता येईल अशी कोणतीही गुप्त जागा असणार नाही. मात्र नर्तिकांसाठी ‘ग्रीन रूम’ ठेवता येईलडान्सबारमधील घडामोडींचे सतत चित्रीकरण करून ते त्याच वेळी पोलीस नियंत्रण कक्षास पाठविण्याची वा ३० दिवसांचे चित्रीकरण जपून ठेवण्याची गरज नाही. फक्त प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही बसविणे पुरेसे.